Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday, 10 January 2014

अंताची सुरुवात

प्रत्येक गोष्टीला अंत आहे कारण तीची सुरुवात झाली होती. मग ती चांगली असो वा वाईट तस नसत तर चांगली माणस अमर झाली असती.

रावणाचा अंत झाला तसा राम राज्याचाहि, फरक इतकाच कि रामाच फक्त राज्य गेल पण हजारो वर्षात लोकांच्या मनातुन राम काही गेला नाही.

अंत कितीही कठोर असला तरी तो सर्वांना जाणीव करून देतो कि तुझी इच्छा असो वा नसो तुला थांबाव लागेल, पण तुझा शेवट कसा असेल यावर तुझ यश अवलंबून राहिल.

रावण गेला पण तो राक्षसत्वात निमाला आणि राम ही गेला पण तो देवत्व पावला, फरक अंतात होता आणि यश ही  अंतातच

आजही एका अंताची सुरुवात होतेय आणि येणारया सुरुवातीलाही अंत असेल, पण फरक शेवट कसा होतो हे ठरवेल.......  

No comments:

Post a Comment