Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Wednesday, 22 January 2014

आंदोलनात गैर काय?

'आम आदमी पार्टी' सध्या चौफेर टिकेचे धनी होत आहेत, पण ही टिका किती वास्तविकतेला धरुन आहे याचा विचार होने आवश्यक आहे.

दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने ती केंद्र सरकारच्या अधीन आहे. न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असे पोलिस खातेही त्यांच्याच अधीन आहे. परंतु यातून एक नुकसान देह गोष्ट पुढे येत आहे ती म्हणजे पोलिस यंत्रणेची अरेरावी.

जर पोलिस यंत्रणा आजपर्यंत केंद्र सरकारच्या अधीन होती तर त्यांना दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर चाप का बसवता आला नाही? आणि आज जेव्हा आप सरकार दिल्लीत स्थापन झाले आहे तर त्यांना पोलिस यंत्रणेकडून योग्य सहाय्य का होत नाही?

जर राजधानीत कोणताही गुन्हा होत असेल तर त्याची अप्रत्याशित जबाबदारी मुख्यमंत्र्यावर येत असेल तर त्याला विवक्षित यंत्रणेवर अधिकार नको? असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांचे त्वरित समाधान मिळावे या हेतुने जर आंदोलन होत असेल तर त्यात गैर काय?

उलट आजही जर राजधानीतील मुख्यमंत्र्याला आपल्या अधिकारासाठी आंदोलन कराव लागत असेल तर ते स्वतः किती हतबल आहेत हे दर्शवत......

No comments:

Post a Comment