Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday, 30 December 2013

उस्फुर्त सहभाग

भारताचा सामाजिक आणि राजकीय इतिहास आणि वर्तमान पाहिला असता अस दिसून येईल कि लोकांना नेहमीच नायक/ नेता याची गरज भासते. जी कोणी अशी व्यक्ति उभी राहिल त्याला ते अनुसरतात.

उदाहरणच द्यायच झाल तर भारतीय राजकारणात जो सध्या भ्रष्टाचार बोकाळतोय त्याला उत्तर म्हणून अन्ना हजारेंनी 'लोकपाल बिल' सादर केले आणि ते जेव्हा सरकारकडून मंजूर झाले नाही तेव्हा त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला, साहजिकच अन्ना समस्त भारतीयांचे नायक ठरले ही एक प्रशंसनीय बाब नक्कीच आहे, परंतु अन्नानंतर कोण? हा प्रश्न जेव्हा उपस्तीथ होईल तेव्हा बहुसंख्य मोजकेच पर्याय सांगतील, केजरीवाल आणि अन्ना यांना सुद्धा मर्यादा आहेत त्यांनाही कुठेतरी थांबावच लागणार आहे, पण त्यानंतर जो प्रश्न उपस्तीथ होईल तो नेत्यांचा नसावा तर जनतेच्या उस्फुर्त सहभागाचा असावा....तुम्हाला काय वाटत?  

No comments:

Post a Comment