Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday 28 February 2014

संविधानिक कर्तव्ये

काही वर्षांपूर्वी एका मित्राकडे मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जायचो, तेंव्हा अभ्यासा व्यतिरिक्त आमच्यात अवांतर विषयावर हि जोरदार चर्चा व्हायच्या. तो पक्का नास्तिक आहे हे मला माहित होत तरी पण मी परमेश्वर आहे कि नाही या गोष्टीवर उगीच त्याची फिरकी घ्यायचो.

त्याला प्रचंड राग यायचा म्हणायचा 'तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन न बाळगता ज्या गोष्टीच्या अस्तित्वावरच चिन्ह आहे त्यावर विश्वास कसा ठेवता ? भारतीय संविधानाचा तुम्ही अशा प्रकारे अव्हेर करता' अस तो म्हणायचा.
त्याच्या मते वैज्ञानिक दृष्टीकोन देश  आणि नागरिकांच्या विकासाला पूरक असतो.

मला हि गोष्ट पटली नाही. कारण सश्रद्ध मन माणसाचा आत्मविश्वास वाढवते आणि बरच काही.... यात वादाला भरपूर वाव आहे. पण मला त्याच्याकडून संविधानाच्या अभ्यासाची गरज पटली, कारण एव्हाना मी संविधान वाचल नव्हत तस ते फार मोठ आहे पण नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची जाणीव तरी किमान व्हावी म्हणून ते वाचल कारण कर्तव्यांची जाणीव असल्याशिवाय तुम्ही हक्कांवर अधिकार दाखवू शकत नाही.

ती  संविधानिक कर्तव्ये पुढे देत आहे ती प्रत्येकाने जरूर वाचावितच पण तसे राहण्याचा प्रयत्न हि करावा कारण हि आपल्या देशाची गरज आहे.

51क. मूल कर्तव्य--भारत के प्रत्येक नागरिक का यह कर्तव्य होगा कि वह--
(क) संविधान का पालन करे और उसके आदर्शों, संस्थाओं, राष्ट्र ध्वज और राष्ट्रगान का आदर करे;
(ख) स्वतंत्रता के लिए हमारे राष्ट्रीय आंदोलन को प्रेरित करने वाले उच्च आदर्र्शों को हृदय में संजोए रखे और उनका पालन करे;
(ग) भारत की प्रभुता, एकता और अखंडता की रक्षा करे और उसे अक्षुण्ण रखे;
(घ) देश की रक्षा करे और आह्वान किए जाने पर राष्ट्र की सेवा करे;
(ङ) भारत के सभी लोगों में समरसता और समान भ्रातृत्व की भावना का निर्माण करे जो धर्म, भाषा और प्रदेश या वर्ग पर आधारित सभी भेदभाव से परे हो, ऐसी प्रथाओं का त्याग करे जो स्त्रियों के सम्मान के विरुद्ध है;
(च) हमारी सामासिक संस्कृति की गौरवशाली परंपरा का महत्व समझे और उसका परिरक्षण करे;
(छ) प्राकृतिक पर्यावरण की, जिसके अंतर्गत वन, झील, नदी और वन्य जीव हैं, रक्षा करे और उसका संवर्धन करे तथा प्राणि मात्र के प्रति दयाभाव रखे;
(ज) वैज्ञानिक दृष्टिकोण, मानववाद और ज्ञानार्जन तथा सुधार की भावना का विकास करे;
(झ) सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखे और हिंसा से दूर रहे;
(ञ) व्यक्तिगत और सामूहिक गतिविधियों के सभी क्षेत्रों में उत्कर्ष की ओर बढ़ने का सतत प्रयास करे जिससे राष्ट्र निरंतर बढ़ते हुए प्रयत्न और उपलब्धि की नई ऊँचाइयों को छू ले;
(]) यदि माता-पिता या संरक्षक है, छह वर्ष से चौदह वर्ष तक की आयु वाले अपने, यथास्थिति, बालक या प्रतिपाल्य के लिए शिक्षा के अवसर प्रदान करे।]

खरतर प्रत्येक कर्तव्याच पालन आवश्यक आहे पण ठळक कलेली कर्तव्ये न पाळण्यामुळे आपल्या देशाच किती नुकसान झाल हे लक्षात याव आणि ठळक मुद्यांवर विशेष लक्ष दयाव हि सदिच्छा.   





Thursday 27 February 2014

शिवोsहम् शिवोsहम्

शिव म्हणजे आपला अंतरात्मा. हिन्दू मान्यतेनुसार आत्मा अलिप्त असतो. चांगल्या वाईटचा त्याच्यावर परिणाम होत नाही. तो नेहमी शुद्धच असतो. शिवाचे पूजन म्हणजे फक्त पिंडीवर बेल फुले वहाने एव्हढाच मर्यादित ठेऊ नका.

जो आत्मविश्वासाने परिपूर्ण तो शिव. जो विचलित होत नाही तो शिव आणि असा शिवरूपी अंतरात्मा प्रत्येकात आहे. त्याची जाणीव होण्यासाठी आजचा दिवस महाशिवरात्री. अहंकार सोडून जगणे आणि जागृत राहणे म्हणजे शिवात विलीन होणे अंतरात्म्यात विलीन होणे.

आपल्या वैदिक प्रार्थनेत शिवतत्व फार छान सांगितल आहे ते दुसरे तिसरे काही नसुन आपल्या अंतरात्म्याचे गान आहे...

न मे द्वेष रागौ न मे लोभ मौहो 
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः। 
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः 
चिदानन्दरूपः शिवोsहम् शिवोsहम् ।।3।।

आजच्या या महाशिवरात्री या वैदिक प्रार्थनेची जाणीव व्हावी हीच सदिच्छा.

(आज मराठी राजभाषा दिन, मराठी जनतेचे मराठी वरील प्रेम अबाधित राहो.... )

Wednesday 26 February 2014

महानायक

चित्रपटसृष्टीतील एकंदर व्यवहार पाहून मी अतिशय निराश झालो. असेही वाटु लागले कि माझा इथे टिकाव लागने फार फार कठिन आहे. एकदा तर मी हे  सगळे सोडून दिल्लीला परत ही गेलो होतो. तेव्हा वडिलांनी मला धीर दिला.  इतक्या लवकर हार मानन्याचे कारण काय असे विचारल्यावर मी त्यांना सांगितले कि चित्रसृष्टीत सुसंसस्कृत प्रतिभासंपन्न माणसाची कदर नाही. तेव्हा त्यांनी मला बलराज सहानींचे उदहारण दिले. ते म्हणाले कि जर बलराज सहानी सारखा विद्वान माणूस स्वतः ला एडजस्ट करून घेऊ शकतो. तर तू का नाही? मला ते पटले आणि मी पुन्हा मुंबईला आलो.
दुप्पट उत्साहाने पुन्हा सुरुवात केली. येताना मी स्वतः चे ड्राइविंग लाइसेंस ही बरोबर घेऊन आलो होतो. गरज पडली तर टॅक्सी चालवेन पण चित्रपटात शिरकाव करुन घेइनच याच ठाम उत्साहाने मी काम सुरु केले. हे फार विचित्र दिवस होते.
(अ....अमिताभचा, दिलीप ठाकूर, सायली प्रकाशन पुणे )

वरील अनुभव कुठल्या व्यक्तीचे आहेत हे सांगण्याची गरज नाही महानायक 'अमिताभ बच्चन'. आपण नेहमी कुठल्याही व्यक्तीचे नेहमी यश पाहतो. पण त्या मागचे त्या व्यक्तीचे 'ध्येय' आणि 'चिकाटी' नजर अंदाज करत असतो. मला पूर्ण आशा आहे कि वरील अनुभव वाचून माझ`असेच प्रतिभा संपन्न मित्र उत्साहित होतील.

हा अनुभव कुठल्या एका क्षेत्राला लागु होत नाही. तुम्ही लेखक असा, अभिनेता असा अथवा कोणी व्यावसायिक. तुम्ही प्रयत्न करता हेच सर्वात मोठ यश....चालत रहा... बाकी योग्य काळ तुम्हाला उत्तर देईलच.... 

Tuesday 25 February 2014

'Fortune Favors Brave'

परवा अच्युत गोड़बोले यांनी फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांच्यातील व्यवहाराची फारच रोचक कथा सांगितली.बरयाच जणांनी 'सकाळ' च्या 'सप्तरंग' पुरवनीत ती वाचली ही असेल. त्यातील १९ अब्ज डॉलर चा मोठा आर्थिक व्यवहार सोडून जर दुसरा भावनिक मुद्दा लक्षात घेतला तर तो फारच ह्रदयस्पर्शी आहे.

भारतातही असे अनेक हुशार आणि नवीन कल्पनानी भारलेले युवक आहेत. तीन चार महिन्यांपूर्वीच बिहारमधील दोन युवकांनी फेसबुक प्रमाणेच एक सोशल नेटवर्किंग साईट विकसित केल्याची बातमी आली होती पण त्यांच्या त्या कल्पनेच्या प्रसारासाठी भांडवलाची विवंचना ही स्पष्ट करण्यात आली होती.

आता माहित नाही ते युवक काय करत असतील. पण त्यांनी फेसबुक, गुगल, माइक्रोसॉफ्ट सारख्या महाकाय कंपन्यानमधे काम करण्यापेक्षा स्वतः च त्यांच्या पंक्तीत जाव ही इच्छा.... गोष्ट वाटते तितकी सोपी नाही पण मला भारतीय भांडवल बाजारातील एक कमजोर मुद्दा अधोरेखित करायचा आहे.

भारतामधे परदेशातील व्हेंचर कैपिटलिस्ट प्रमाणे जोखमीच प्रमाण आणि संख्या फारच कमी दिसते, नाहीतर अमेरिकेतील गुगल, फेसबुक सारख्या एकातरी कंपनीचा उदय भारतात झाला असता. जेंव्हा आजच्या पिढीतील युवक एखादी कल्पना विकसित करतो तेंव्हा त्या विवक्षित कल्पनेच्या विकास आणि प्रसारासाठी त्याला फार मोठया भांडवलाची गरज पडते.

नवीन कल्पनेच्या विकासातील धोका लक्षात घेता बँका अशा गोष्टींसाठी पुढाकार घेत नाहीत हा माझा अनुभव आहे आणि अशा वेळी उपयोगी येतो रिस्क टेकर जो तुमच्यावर विश्वास ठेऊन डाव खेळायला तयार असतो, ज्याला व्हेंचर कैपिटलिस्ट म्हणतात.आजच्या  IT क्षेत्रातील फेसबुक, गुगल सारख्या मोठया  कंपन्या त्याचच फळ आहे.   

'Fortune Favors Brave' अस म्हणतात ते खोट नाही. आज अमेरिकेकडे 'महासत्ता' हे बिरुद आहे ते याच रिस्क टेकिंग फॅक्टर मुळे, नाहीतर IT क्षेत्रातील बौद्धिक संपदेने युक्त भारतात असे मोठ मोठे व्यवहार फार पूर्वीच घडले असते.    

Monday 24 February 2014

चिंता करितो विश्वाची

आज 'रामदास नवमी' समर्थ रामदास स्वामींचे कार्य महाराष्ट्रातील जनतेसाठी अक्षुण्ण आहे. त्यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक यांची कित्येक पिढ्यांनी पारायणे  केली असतील आणि आजही मनाचे श्लोक मधील एखादा श्लोक मुख्दगत नसेल असा मराठी माणुस विरळाच.

समर्थांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी बलोपासनेबरोबरच मनाला वळण लावनारया श्लोकांची रचना केली, कारण शक्तीचा सदुपयोग फक्त चांगल्या मनाची व्यक्तीच करू शकते. सबंध आयुष्यभर 'चिंता करितो विश्वाची' या भावाने निस्वार्थ कार्य करणारया समर्थांना शतकोटी प्रणाम

।।जय जय रघुवीर समर्थ।।  

Sunday 23 February 2014

मिसळ

मागच्या वेळी रविवारी मित्राबरोबर मिसळ खायला गेलो. चिंचवड सारख्या ठिकाणी मिसळ मिळण अवघड बिल्कुलच नाही.प्रत्येकाचा मिसळ खाण्यासाठीचा खास अड्डा बिलकुल ठरलेलाच असतो आणि जो तो आपण जिथे मिसळ खातो तीच सर्वात बेस्ट कशी याच महिमा मंडन करत असतो. पण आम्ही ज्या ठिकाणी गेलो ते तुलनेने तस नवीनच होत एकाच्या रेकमेंडेशनवर आम्हीही तिथे पहिल्यांदाच चाललो होतो.

जागा तशी थोड़ी कंजेस्टेड होती पण आम्ही ती गोष्ट नजरअंदाज करत तिथेच एक कोपरयातला टेबल पकडला आणि दोन कडक (मीडियम ऑप्शन होता म्हणून ) मिसळची आर्डर दिली.
"व्वा.... मिसळ म्हंजी येकच नंबर मजा आली!" एक फर्मास भुरका ओढत आमच्या समोरची ज्येष्ठ व्यक्ति बोलली पायजामा आणि गांधी टोपी घातलेली
आम्हीही उगी हसून माना डोलावल्या, होतो माणुस कधी-कधी भावनिक. एव्हाना आमची आर्डर आली. आम्हाला वाटल बाबा आता शांत बसतील पण कसच काय,
"प्या- प्या त्या बिगर मजा नाय" मी हास- हुस करत होतो, नाक लाल झाल होत. मला थोडा रागच आला. यांना काय करायचय? (तीच शहरी मानसिकता ) पण मी पुन्हा हसून नुसतीच मान डोलवली...
"येsss, बारक्या कट आन कि हयासनी" पुन्हा बोलले आणि एका बाजूने त्यांच मिसळ खाण्याच काम ही मन लावून चालल होत. नाही म्हटल तरी शंका यावी हे इथले मालक तर नाही? म्हणून बाबांना विचारल....
"बाबा तुम्ही इथलेच वाटत?"
"न्हाय यिथ कामाला आलूय ठेकेदारीव, यिथ बाजूलाच मिस्तर्याच काम चाललय"
"बर- बर" मला उत्तर भेटल, पण बाबा पुढे बोललेच....
"म्हनल यिथ याव मिसळ खायला नावावरन तर वाटल न्हाय (अरिहंत) यिथ झणझणित मिसळ भेटल म्हणून, पण चांगली हाये बर का?"
आता मला बाबांच कौतुक वाटु लागल किती साधा माणुस ते सुद्धा आमच्या सारखेच पैसे देऊन मिसळ खात होते पण त्यांना ती आवडल्यावर मनसोक्त कौतुक तर करत होतेच पण समोरच्यालाही आपलेपणाने आग्रह करत होते बिना काही स्वार्थाच.
मला लाज वाटली, आजकल फेसबुक च्या जमान्यात आपण कितीतरी गोष्टींना लाइक आणि शेयर करत असतो पण कधी आपण बायको किंवा आईच्या हातच जेवन चांगल झाल म्हणून तीच चार चौघात कौतुक करतो? आपल्या एखाद्या मित्राने किरकोळ का होईना मदत केल्यावर त्याचे आभार मानतो ? आपल्या भावंडाने काही चांगल काम केल्यावर कड़ कडुन मीठी मारतो? या आणि कितीतरी गोष्टी
"आरामशीर होउ दया" अस म्हणत बाबा उठले आणि काउंटर वर जाऊन पैसे देत आवर्जून त्या मालकाचही कौतुक केल, बाबानी मला चांगलीच जाग आणली....
मिसळ खाण पहिल्यांदाच इतक सत्कारनी लागल, ते पण बिना एसिडिटीच..... कस?        

Saturday 22 February 2014

मुक्ति वजा बंधन

पूर्वी कधीतरी मी अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून मुक्तीची सोपी व्याख्या ऐकली होती, 'शाळेतला एखादा मुलगा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन बाहेर पडतो आणि सुटकेचा दिर्घ निश्वास टाकतो ती मुक्ति'
किती सोपी व्याख्या...

पण आज वर्ष उलटून गेली आहेत मनाची जाणीव ही थोड़ी प्रगल्भ झाली आहे आणि ती मुक्तीची व्याख्याही आताशा समाधान करत नाही. तो वार्षिक परीक्षा पास झालेला मुलगा जेंव्हा पुढच्या वर्गात जायची स्वप्न पाहतो तेव्हाच त्याची मुक्ति बंधनात परिवर्तित होत असते.

शाळेनंतर नोकरीची, नोकरीनंतर कुटुंबाची नंतर मुलांची प्रत्येक गोष्टीची आस... जणू साखळीच तयार होते. आणि हीच साखळी केंव्हा पायात पड़ते हे कळत सुद्धा नाही आणि आश्चर्य म्हणजे मुक्तिपेक्षा याच बंधनात आपल्याला आनंद वाटत असतो.

Friday 21 February 2014

बोलतो मराठी

२७ फेब्रुवरी जागतिक मराठी भाषा दिवस, आज पासून म्हणजे २१ फेब्रुवरी पासून मराठी भाषा सप्ताहाला सुरुवात होतेय.

फ़क्त भारतीय इतिहासातच नाही तर जागतिक स्तरावरही मराठी भाषेचे महत्व अमूल्य आहे ७० -८० दशलक्ष मराठी  भाषिक लोक याचा सज्जड पुरावा आहे.

पण सध्याच्या काळात एक गोष्ट नेहमी खलते मराठी साहित्य आणि कलेने एव्हढी समृद्ध ही आपली भाषा आपण मराठी बांधवच वापरायला का कचरतोय ?

हा माझा भाषेविषयीचा दुराभिमान नाही पण जर आपण महाराष्ट्रात राहूनही व्यवहारिकतेत प्राधान्याने मराठी भाषा वापरत नसु तर ही आपलीच चुक आहे.

त्यानंतर मराठी भाषेचा अस्त होत आहे अशी व्यर्थ ओरड करण्यात काय हशील ? असा म्हणतात कि छोट्या-छोट्या गोष्टीतूनच मोठी ध्येय साध्य होतात याच तत्वाचा वापर करुण आपण मराठी भाषा समृद्ध करूयात

आपण प्रतिज्ञा करुया 
  • मी व्यवहारात मराठी भाषेचाच प्राधान्याने उपयोग करेन.
  • मराठी साहित्याच वाचन करेन.
  • अमराठी मित्रांना मुलभुत व्यवहारिक मराठीचा वापर शिकवेन.

या तीन मुलभुत गोष्टींनी आपण मराठी भाषेच्या संदर्भात बरच काही साध्य करू शकतो आणि अभिमानाने म्हणू शकतो.... बोलतो मराठी !

Thursday 20 February 2014

यम धर्माचा अस्त

सध्या राजीव गांधी मारेकरयांच प्रकरण फारच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वीच फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याच कारण देत त्या तिन्ही मारेकरयांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आल आहे.

अफजल गुरूच्या शिक्षेच्या सन्धर्भातही असच काहिस वळण लागणार होत पण सुदैवाने तस घडल नाही, पण वरील घटना ही काही कमी दुर्दैवी नाही. ज्या देशात स्वयं पंतप्रधानांच्या मारेकरयांची शिक्षा सौम्य केली जाते आणि संसद भवनसारख्या राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालनारया अतिरेक्याच्या दया अर्जावर व्यर्थ काथ्या कुट केला जातो तिथल्या जनतेवर याचा काय परिणाम होत असेल ?

सत्ताकारन लक्षात घेऊन फ़क्त एखाद्या विशिष्ठ गटाला किंवा राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी देशाच्या सार्वभौम घटना आणि न्याय व्यवस्थेशी ही जी काही तडजोड होत आहे ती फारच खेदजनक आहे आणि उद्या या घटनाच आपल्या अंगलट येऊ शकतील.

आजचा स्वतंत्र तेलंगाना मुद्दा असो, मराठा आरक्षण असो, कश्मीरचे विशिष्ट कलम असो किंवा ईशान्य भारतीयांशी दुजाभाव ही तर फक्त येणारया  अराजकाची बीजे आहेत. का म्हणून कोणी न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करावा ज्यांच्या हातात आपण मोठया विश्वासाने तराजू दिला आहे त्यांना त्यांच काम करू दया.

उलट न्याय पालिकेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही असता कामा नये परंतु दुर्दैवाने भारतात तो दिसून येतो. आणि ज्या देशात न्याय पालिका स्वतंत्र आणि हस्तक्षेप विरहित नाही तिथे अराजक पसरायला वेळ लागत नाही आणि आज आपण ते पाहतोय. 

सावधान यम धर्म अस्त पावत आहे.…

Wednesday 19 February 2014

निश्चयाचा महामेरु

आज छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती, मराठी लोक आणि महाराष्ट्र यांच्यात अस्मिता निर्माण करणार जाज्वल्य व्यक्तिमत्व.

शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशभरात आणि खास करुण महाराष्ट्रात इतका मोठा आहे कि मरणोपरांत प्रभाव कायम असलेल्या व्यक्तिमत्वात श्री कृष्णानंतर शिवरायांचा क्रमांक येईल....

महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणे असंभव आहे, पण समर्थ रामदास स्वामींच्याच शब्दात सांगायच तर

निश्चयाचा महामेरु। बहुत जनांसी आधारु 
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी 
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयासी 
तयाचे गुणमहत्वासी। तुळना  कैंची ?    

महाराज! मराठी जनांच्यात तुम्ही अस्मिता, अभिमान आणि सामर्थ्याच स्फुल्लिंग पेटवलत.... तुम्हाला  त्रिवार मुजरा......


Tuesday 18 February 2014

मुक्तशैली

काल मला माझा एक जुनी बॅग भेटली. त्या बॅगमधे मी बरयाच वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली बरीच टिपने होती, चांगल्या पुस्तकातील चांगले विचार इत्यादि...

पण या वेळी फरक इतकाच होता कि ती वाचताना मला जाणीव झाली कि त्यावेळी मी जितका ओपन माइंडेड होतो (इतरांचे विचार स्वीकारण्याकरता) तेव्हढा आताशा नाही.

शाळेत असल्यापासून ते काल परवा पर्यंत बरीच पुस्तके वाचली आणि सध्या जे काही थोडफार लिहु शकतो ते त्यामुळेच पण...

आज कल नवीन पुस्तके ही वाचू वाटत नाही, आता लिहू वाटत. या मागच एक कारण असही आहे कि इतरांच्या विचारांचा प्रभाव पडून मी साचेबद्ध होउ नये.

हा विचार कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही, पण या विचारामुळेच लिहायला धैर्य भेटत अशासाठी कि तुम्ही तुमच्या शैलीत लिहिता मुक्तपणे आणि थोड़े का होईना लोक तुमच्या विचारांच स्वागत करतात.

म्हणून आजचा ब्लॉग माज्या विचारांच स्वागत करणारया सर्वांसाठी.... Thank You All......



 

Sunday 16 February 2014

गृहीत बांधव

आज एका विचित्र बातमीकडे लक्ष गेल. 'ताज महल' पाहण्यासाठी गेलेल्या अपंगांना तेथील सुरक्षा रक्षाकानी मज्जाव केला, कारण तस चुकिच नव्हत. ताज पाहण्यासाठी तेथे अपंगांसाठीचा रैंप (उतरणीचा मार्ग ) नसून पायरया च आहेत आणि ताज जागतिक वारसा असल्याने तेथील नियम या गोष्टीला मज्जाव करत होता.


पण मुख्य प्रश्न अपंगांना मज्जाव नसून त्यांच्या सोयीसाठी रैंपची व्यवस्था का करण्यात आली नाही हा आहे. कि आपण अपंगांना एव्हढ गृहीत धरल आहे कि आपण त्यांचा विचारच करू नये.

 जागतिक वारसा स्थळे अपवाद झाला, पण बरयाच कॉर्पोरेट ऑफिस तसेच सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्स ही रैंप विरहित आहेत आणि अशा ठिकाणी जेंव्हा त्यांना असहाय पाहतो तेंव्हा फार वाईट वाटत.

वाईट त्यांच्या अपंगत्वाच नाही तर त्यांच्यासाठीच्या एका साधारण सोयीच्या अभावाच वाटत. आज भारताची लोकसंख्या एव्हढी प्रचंड आहे कि आपण ज्या आपल्या अपंग बांधवांची संख्या काही टक्क्यांमधेच मानली तरी त्यांची संख्या कोटींच्या घरात जाईल.

तेंव्हा त्यांच्या या साधारण परंतु महत्वपूर्ण गरजेची पूर्तता व्हायलाच हवी कारण आपल्या लोकशाही प्रधान  देशात प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो एका साधारण गृहितकावर अवलंबून राहता कामा नये.

Saturday 15 February 2014

ना-राजीनामा

अरविंद केजरीवाल यांना शेवटी काल राजीनामा देण भाग पडलच. खरतर लोकपाल बील मंजूर झाल असत तर ही वेळ आलीच नसती. हा केजरीवालांचा राजीनामा नसून जनतेचा ना-राजीनामा आहे .

या घटनेमुळेच का होईना इतर पक्षांचे सत्ताकारण पुनः एकदा जनते समोर आले आहे. सरकारी लोकपाल पेक्षा अण्णांना अपेक्षित आणि आप ने मांडलेले लोकपाल विधेयक कितीतरी उजव होत. अस मजबूत लोकपाल विधेयक मंजूर करुण भ्रष्टाचाराला आळा घालणे सोप झाल असत.

पण विरोधकांना आपण या भ्रष्टाचाराच्या दलदलीत किती खोल अडकलो आहोत याची जाणीव असल्यामुळे ते हे विधेयक मंजूर करणार नाहीत हे स्वच्छ होत आणि राहिल.

यावर उपाय एकच, लोकशक्तिच प्रदर्शन. लोकांना कोण किती भ्रष्ट आहे याची पुर्ण जाणीव आहे. मतदार जागरूक आहेत. दशकभरा पूर्वीची ती 'चलने दो' मानसिकता राहिली नाही कारण भ्रष्ट राजनितीचा अप्रत्यक्षित तोटा शेवटी जनतेलाच महागाई बेरोजगारी यांच्या रुपाने होत आहे.

तेंव्हा अशा भ्रष्ट लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. दिल्ली मध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे आणि या वेळी 'आप' ला प्रचंड बहुमत भेटल तर भारतीय लोकशाहित नवा पायंडा पडेल आणि ही घटना येणारया लोकसभा निवडणुकीचा रोखही निश्चित बदलेल.

Thursday 13 February 2014

रक्तदान

'रक्त' माणसा माणसात नात सांगणारा एक महत्वपूर्ण घटक, पण इथे फक्त रक्ताची नाती या कुप मंडूक वृत्तीने याचा उल्लेख करत नाहीये.

बर झाल... निसर्ग नाती गोती या मनुष्य निर्मित गोष्टींनी बाधित नाही. नाहीतर एकाच नात्यातील लोकांना रक्तासाठी एकमेकांवरच अवलंबून रहाव लागल असत.

जर निसर्गानेच आपल्याला रक्तबंधनात न अडकवता रक्तदानासाठी  एव्हढी चांगली संधी दिली आहे तर आपण त्याचा उपयोग का करू नये?

चला नात्यांच्या पलीकडेही फार मोठ जग आहे मनुष्यत्वाच ते निभवुया..... रक्तदान करूया......

Photo

   

Wednesday 12 February 2014

राजमार्ग

कुठल्याही कार्यासाठी जनतेला प्रोत्साहित करुन त्यांना कार्यप्रवृत्त करणे ही फारच अवघड गोष्ट आहे, पण ज्यांच्याकडे वक्तृत्वकौशल्य आहे त्यांच्यासाठी हा फक्त खेळ असतो.

राज ठाकरे ही प्रभूति या खेळातील महारथी आहे आणि आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे ते अर्ध्वयु आहेत. जनतेला चेतवन्याची जी क्षमता राज ठाकरेंकडे आहे ती सध्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही.

त्यांच्या कार्यात आणि सभेत जो धड़ाका असतो तो इतरत्र कोठेही पहायला मिळणार नाही, आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे जे परिणाम होतील ते शक्यतो सकारात्मकच व्हावेत हीच इच्छा.

खरतर जनतेचा पूर्वी टोल साठी विरोध नव्हता, परंतु त्यातील पारदर्शकतेचा अभाव आजच्या असंतोषाला कारणीभूत आहे. राज ठाकरे यांनी तो मुद्दा उपस्तिथ केला ही चांगलीच गोष्ट आहे.

पण या आंदोलनात अस्थाई तत्ववर काम करणारया टोलवरील  कर्मचार्यांना मारहाणीचा त्रास होउ नये याची काळजी घेण पक्षाची जबाबदारी आहे आणि तोच पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी राजमार्ग असेल.

Tuesday 11 February 2014

बदलीची नियुक्ति

लहान मूल जेंव्हा रडत तेंव्हा त्याला खुळ-खुळा वाजवून शांत केल जात आणि ते तात्पुरत का होईना रडायच थांबत, असच काहीस श्रीकर परदेशी यांच्या बदली विरोधी आंदोलनाच होत आहे.

आजच्या वर्त्तमानपत्रातील बातमीप्रमाणे परदेशी यांची नियुक्ति मुद्रांक शुल्क विभागात करण्यात आली आहे. म्हणजे ते आयुक्त या पदावर राहणार नाहीत.

फरक फक्त इतकाच कि बदलीची नियुक्ति करुन जनक्षोभ शांत करण्याचा प्रयन्त करण्यात आला आहे. आता पाहु हा खुळ-खुळा कितपत कारगर ठरतोय ते.

Monday 10 February 2014

जन पळभर म्हणतील हाय हाय....

सध्याचा राजकीय गदारोळ पाहता स्वामी विवेकानंदांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवत " कुठल्याही कार्याची सुरुवात पहिल्यांदा टीकेने होते, आणि नंतर तिचा स्वीकार केला जातो''

ही एक जनरीतच आहे. लोकपाल विधेयक मंजूर व्हाव या हेतूने अण्णांनी आंदोलन केल तेंव्हा विद्यमान सरकारने त्यांना अटकच केली नाहीतर त्यांच्यावर भल भलते आरोपही केले.

पण शेवटी काय झाल? सरकारला त्यांच्या कलेने केलेले  का होईना लोकपाल विधेयक मंजूर कराव लागल. ते विधेयक आणखी कड़क आणि कायदेशीर व्हाव यासाठी सध्या केजरीवाल कार्यरत आहेत. 

आणि जनरीति प्रमाणे त्यांच्यावर टिकाही होत आहे, पण ही तर फ़क्त पहिली पायरी आहे. 'आप' आग्रही असलेल्या मजबूत लोकपाल बिलाचाही नक्कीच स्वीकार होईल यात शंका नाही.

म्हणूनच कदाचित काल जेंव्हा केजरीवाल यांनी अण्णांची भेट घेतली तेंव्हा अण्णांनी त्यांना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला आहे. त्यांना विश्वास आहे हे ही दिवस जातील, कारण लाटांच अस्तित्व कधीच कायम नसत.

Sunday 9 February 2014

जागृति

'आयुक्तांच्या' बदली विरोधात पिंपरी चिंचवडकरानी जो उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे तो पाहता सध्या नागरिक किती सजग आणि जागरूक झाले आहेत हे लक्षात येत.

पूर्वी प्रमाणे आंदोलनाच स्वरुप असामाईक न राहता ते सामाईक तर झाल आहेच, परंतु त्याचा विस्तार आणि अवाकाही वाढला आहे.

जनते मध्ये ही जागृति निर्माण व्हायला बरेच घटक कारणीभूत आहेत त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे भ्रष्टाचाराने ओलांडलेली पातळी.

अन्ना हजारेंनी केलेले आंदोलन ही ठिणगी होती आणि त्या ठिणगीनेच आता वनव्याच प्रचंड रूप घेतल आहे, जे देशातील भ्रष्ट नीति खाक करतील आणि निवडक जनप्रतिनिधींची अरेरावीही.

लवकरच देशात परिवर्तनाची लाट येईल यात शंका नाही आणि निवडणूक ही सत्ता सम्पादनची पायरी न राहता लोकाभिमुख शासनाची नांदी ठरेल.

सामन्यातील कोणालाही लोकप्रतिनिधि म्हणून उभे राहताना कोणाच्या हाताची नाही तर निव्वळ जनतेच्या पाठिंब्याची, आपल्या पाठिंब्याची गरज असेल.

जेंव्हा देशाची राजनीती व्यक्तिकेंद्री न राहता जनकेंद्री होईल तो खरा सुदिन आणि ती वेळ आता येऊन ठेपली आहे.

Saturday 8 February 2014

दाद

शेवटी श्रीकर परदेशी यांची बदली झालीच. ज्यांच्या कडे दाद मागायची त्यांनीच केली, आणि त्यात आपण जर जनता जनार्दन म्हणून या गोष्टीचा निषेध केला नाही तर आपणही अन्यायला न्याय देणारे ठरू.

शाळेत असताना आम्हाला नागनाथ कोत्तापल्ले यांचा 'दाद' नावाचा एक धडा होता त्यात एका गरीब मुलाची बकरी गावातील पाटलाचा मुलगा काही आडदांडा बरोबर बळजबरीने फस्त करतो...

तो मुलगा गावात  पाटलाकडे न्याय मिळेल या आशेने जातो... पण त्याची निराशा होते... गावातील लोकही पाठ फिरवतात.... शेवटी निराशेने तो मरतो.... आणि विडंबना ही की लोक त्याच्या समाधीला शेंदुर फासुन त्याला बकरोबाची समाधी म्हणून नाव देतात.... आणि वर त्याला खुश करण्यासाठी बकरयाचा बळीही....

त्यावेळी मी ही कविता केली. पण खरच वाटल नव्हत लोक असे असतात म्हणून पण आज समजते ती समजाचे भीषण वास्तव मांडणारी एक रूपक कथा होती. ही कविता मी त्या सर्व राजकीय नेत्यांना समर्पित करतो कदाचित ते आम्हांला न्याय देतील नाहीतर समाधी आहेच (यावेळी आमची नाही... तुमची. )

दाद

दाद मागसी कुणाला 
न्याय देती कुणास 
भोळी भाबडी हि जनता 
 न्याय देती अन्यायास 
दगडासी माने देव 
शेंदुर फासुनिया 
नवस करी दगडास 
 पावे म्हनुनिया 
बळी तो कान पिळी
करी स्वतःची मनमानी 
न्यायास थारा नाही 
अन्यायाला तारी

Friday 7 February 2014

काहीच न सुचन्यावर

 एखादी गोष्ट दररोज करायची म्हंटल तर ते एक दिव्यच असत. मग तो नेहमीचा व्यायाम असो नाहीतर दैनिक काम, पण नाइलाज म्हणून केलेल्या कामात तेव्हडा उत्साह जाणवत नाही.

ब्लॉग लिहिन हे सुद्धा माझासाठी एक रूटीन आहे. हे कामसुद्धा वाटत तितक सोप नाही, नेहमीच नव नवीन विचार डोक्यात येतात पण ते व्यवस्तिथ शब्दबद्ध करण फारच जिकिरिच काम.

आता आजचच पहा काय लिहाव हेच सुचत नव्हत. खुप रेफेरेंस शोधले, वर्त्तमान पत्र चाळले, जुनी टिपने पाहिली पण काही पटेनाच.....

शेवटी वैतागून विचार केला आज काहीच न सुचन्यावर लिहाव..... आणि आश्चर्य यावरही ब्लॉग लिहून झाला. 'काहीच न करणे हे सुद्धा एक काम आहे' याचा अर्थ आता मला पटला.      

Thursday 6 February 2014

देशाची शाळा

सध्या टी व्ही वरील राजकीय पक्षाच्या 'आम्ही काय केले' (?) (हे वाक्य द्वयार्थीही वापरू शकता) या थाटातील जाहिराती पाहिल्या तर आपसुकच हसु फुटेल. अशा जाहिराती पाहिल्यावर मला शाळेतले दिवस आठवतात.

आम्हाला त्यावेळी शाळेतून छोटे बिस्किटचे पुडे मिळायचे, प्रत्येकी एक असे. मग आमच्यातलाच एखादा वर्गप्रमुख आम्हा शामळु पोरांजवळ यायचा आणि म्हणायचा "तुम्ही मला बिस्किटचे पुडे दया, मी तुम्हाला बाकी पोरांपासून वाचवतो" (त्यावेळी आम्ही फारच सरळमार्गी होतो, इतके कि कोणीही येऊन टपली मारावी ) मग आम्हीही नाइलाजाने का होईना पुडे त्याच्या पुड्यात टाकायचो.

आज त्या वर्गप्रमुखाच्या जागी  देशाचे नेते आहेत जे सामान्य जनतेच्या पुड्यातूनच स्वतःचे पोट भरतायत आणि वर आम्ही तुमचे एकमात्र वाली असल्याचा आव ही आणतायत....... शाळेत देश कसा घडवायचा हे शिकवतात, तर इथे देशाची शाळा कशी करायची याच प्रात्यक्षिक सुरु आहे.    

Wednesday 5 February 2014

बेळगाव (निबंध)

काल लग्नानिमित्त पहिल्यांदाच  बेळगावला जाण झाल.तिथे उतरल्यावर  बेळगावबद्दलच्या सर्व कल्पनांचा पूर्ण निचरा झाला.

तस  बेळगाव नावा प्रमाणेच गाव आहे, तिथे एकही ईमारत म्हणावी अशी वास्तु निदर्शनास आली नाही. सगळीकडे बैठी घर....

आपल्या येथील पिंपरी कैम्प आणि निगडी प्राधिकरण एरिया याच्याशी फारच मिळता जुळता परिसर. तिकडे मराठी आणि कन्नड़ दोन्ही भाषांचा वापर होतो आणि स्थानिक लोक कर्नाटकी हेलात पण मराठी चांगल बोलतात....

परिसराची माहिती व्हावी म्हणुन मित्रांबरोबर पाईच फिरलो. मंदिरे छान आहेत आणि बहुसंख्य मूर्ति काळ्या पाषाणातिलच होत्या तिथे छत्रपतींचे दोन तीन पुतळेही पाहिले आणि तिथल्या थिएटर बाहेर टाइमपासची पोस्टर्सही, बाकी  बेळगाव आहे कर्नाटकात पण आपण  महाराष्ट्रा बाहेर आहोत अस काही तिथे जाणवत नाही..... समजल ना..... ?              

Monday 3 February 2014

पुन्हा एक

पुन्हा एक सोमवार- पुन्हा एक दिवस- पुन्हा एक चक्र आणि या चक्रातला पुन्हा एक मी... 

भूगोलातील गोल- गोलातील भूगोल आणि त्यातील आम्ही.....

चौकट मोडायला गेल तर ही चौकट नाही,

आणि या गोलाला काही अंत नाही...... 


Sunday 2 February 2014

बांदावरची शेती

गेले ५ दिवस मला ब्लॉग लिहिता आला नाही... कारण? तेच, पी सी बंद मग तीच नेहमीची धावपळ पी सी सुरु करण्याची.

बाकी मेल आणि सोशल नेटवर्किंग आपण मोबाइलवर पण चेक करू शकतो पण ब्लॉग लिहिणे अवघडच. बांदावरची शेती हा वाक्प्रचार अशा स्तिथित चांगलाच लागु होतो.

गेले ५ दिवस बांदावरची शेतीच करतोय, पण खर सांगू... बिल्कुलच मज्जा नाही शेतीतच खरी मजा. माजे असे बरेच मित्र आहेत जे क्रिएटिव आहेत पण त्यांची क्रिएटिविटी बांदावरच अडकलीये.

त्यांनी खाली उतराव हिच इच्छा......