काळाच्या शक्तिच मापन
काळाच्या प्रवाहाच सोदाहरण स्पष्टीकरण दिल्यानंतर काळाच्या शक्तिच मापन हा प्रश्न गौण राहणार नाही. काळ हा अनादी स्वयं पूर्ण असल्यामुळेच त्याच्या या गुणधर्मातच अखिल ब्रह्मांडाच्या व्युत्पत्तीचे सार आहे. ते असे कि काळ प्रवाही होता आणि आहे म्हणूनच विश्वाची व्युत्पत्ती झाली व भविष्यातील व्युत्पत्तीचे कारणसुद्धा काळच राहील.
जर हा काळ प्रवाही नसता तर अखिल ब्रह्मांडाची व्युत्पत्ती झालीच नसती, कारण काळ जर आपण स्थिर कल्पिला तर त्याच्यात चळवळ कशी होणार? चळवळी मुळेच कार्य होते व कार्यातून कारण आणि शेवटी आश्चर्यकारक इतिहास निर्माण होतो. सांगायचा मुद्दा हा की काळाच्या प्रवाहीपणाच्या गुणधर्मामुळेच चळवळ निर्माण झाली आणि त्या चळवळीचा परिणाम म्हणजे ब्रह्मांडाची व्युत्पत्ती.
थोडक्यात सांगायच तर काळ हा शक्तीच्या परेय आहे. तो काल होता, आजही आहे, उद्याही राहील आणि शुन्यातही त्याच अस्तित्व कायम राहील. टिक... टिक.... टिक....