काल एका न्यूज चैनल वर एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी जमा झालेल्या जनतेच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. लोक उत्साहाने सभेस आले होते. २५-३० किलोमीटर दूर अंतरावरूनही आले होते आणि येताना जेवणासाठी डबेही घेऊन आले होते...
जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....
इथे जाणून घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...
इथे मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.
इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच स्वतंत्र नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.
आपल्या विखारी भाषणात काही नेते मग विशिष्ठ समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...
जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....
इथे जाणून घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...
इथे मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.
इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच स्वतंत्र नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.
आपल्या विखारी भाषणात काही नेते मग विशिष्ठ समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...