Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday 14 April 2014

एक आणि एकी

काल एका न्यूज चैनल वर एका राजकीय पक्षाच्या सभेसाठी जमा झालेल्या जनतेच्या मुलाखती घेण्यात येत होत्या. लोक उत्साहाने सभेस आले होते. २५-३० किलोमीटर दूर  अंतरावरूनही आले होते आणि येताना  जेवणासाठी डबेही घेऊन आले होते...

जो तो त्यांच्या नेत्याचे समर्थन करत होता. त्यांचच सरकार  याव अशी इच्छा जाहीर करत होता. बहुतांश समाज कष्टकरी वर्गातलाच दिसत होता आणि इकडे बातमीदार त्यांच समर्थना मागील इस्पित जाणू इच्छित होता. तो धूर्तपणे म्हणाला 'उच्च वर्गातील लोक तर यावेळी दुसरयाच पक्षाला समर्थन देणार आहेत' त्यावर बहुतांश लोकांच एकच उत्तर आमचाच नेता निवडून येईल....

इथे जाणून  घ्यायचा मुद्दा एकच, आणि तो म्हणजे आपला भारतीय समाज स्वतः भोवतीच्या  कोशातच कसा गुरफटला आहे... निवडणुकीत जात हा मुद्दा किती परिणाम कारक ठरू शकतो...आणि या एका गोष्टीनेच भारतीय समाज कसा विभाजित झाला आहे...

इथे  मतदार फक्त मतदार न राहता 'अल्पसंख्यांक' आणि 'जातीय' कक्षेत मापला जातो. त्यामुळे सार्वजनिक स्तरावर देशाच हित पाहिल न जाता समाज आपल्या समुदायाच हित पाहू लागतो आणि इथेच एकीच बळ कमी पडत. जेव्हा एकीच बळ कमी पडत तेव्हा समाज दुबळा होतो आणि दुबळा समाज असलेला देश स्वतंत्र नसतो.

इतिहासात डोकावून पाहिल तर आपल्या याच दुर्बलतेचा फायदा पूर्वी इंग्रजांनी घेतला आणि आता आपलेच काही देश बांधव  घेत आहेत, आणि हे सत्य आहे की दुबळी व्यक्ती आणि समाज केव्हाच  स्वतंत्र  नसतात. पूर्वी परक्यांनी गुलाम बनवल आज आपलेच बनवतायत. आपल्या  देशात डझनाहूनही जास्त राजकीय पक्ष असण्याच हेच कारण आहे.

आपल्या विखारी भाषणात काही नेते  मग विशिष्ठ  समुदायाला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करतात पण निषेध करण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण निर्बल आहोत आणि आपल्यात एकी नाही तेव्हा जागे व्हा देश हितास प्राधान्य द्या समुदायास नाही. 'एकी दाखवा एक व्हा'...

Saturday 12 April 2014

लागे-बांधे

 सध्या राजकीय वातावरण चांगलाच तापल आहे, प्रत्येक जन एकमेकांची जुनी प्रकरण उकरून काढत आहे. कोणी धार्मिक, कोणी उद्योग जगातील लागेबान्ध्यांची आणि जमल्यास अनधिकृत बांधकामांची.... पण कोणालाही जनतेबद्दलचा विशेष कळवळा दिसून येत नाही.

जुनी प्रकरणे उकरण्या ऐवजी ती वेळीच निदर्शनास आणून होऊ घातलेले गैर व्यवहार का रोखले जात नाहीत? कारण तस साफच आहे दुसरयाकडे बोट दाखवणारा हेही जाणून असतो की उरलेली चार बोटे त्याच्याकडे आहेत विशेषतः राजकारणात तरी...

एकदा का राजकीय निवडणुकीचे रंग उतरले की विविध पक्षांचे तुझ्या गळा माझ्या गळा सुरु... जनतेचे प्रश्न दुय्यम आणि प्रतिनिधींचा वैयक्तिक स्वार्थ प्रार्थमिकता प्राप्त करतो. संसदेतील खासदारांच्या वाढवण्यात आलेल्या भत्त्या संदर्भातील प्रकरण सर्व परिचित आहेच.

अशा वेळी रवींद्रनाथ टागोर यांचे विचार योग्य वाटतात ते असे की "आपणाला जे पाहिजे ते सरकारने लगेच दिले तर सरकार व प्रजा यांच्यात सलोखा निर्माण होईल असे काहींना वाटते, पण एका बाजूने भीक मागणे व दुसरया बाजूने भीक घालणे या गोष्टी संपणार कधी?"

इथे टागोरांना हेच सांगायच आहे की प्रजेने सरकारचे मिंधे न राहता स्वतः हून  पुढाकार घेऊन देश सेवा करावी तरच देशाचा उद्धार होईल. बाकी एक सरकार जाऊन दुसर येईल, हे चक्र सुरूच राहणार... मग काय आपण दरवेळी आशाळभूतपणे कोणा पक्ष किंवा व्यक्तीकडे पाहत राहणार? की जो आपला उद्धार करील....

राष्ट्रात कोणी एक व्यक्ती कधीच हिरो होऊ शकत नाही कारण राष्ट्र निर्माण हे सामुहिक कार्य आहे, कोणा एका व्यक्तीच नव्हे... तेव्हा विचार करा आणि राष्ट्रासाठी मतदान करा कोणा व्यक्ती किंवा पक्षासाठी नव्हे.

Tuesday 8 April 2014

साधन आणि साध्य

 'धड पड करून शहाणे लोक घरे का बांधतात? पाहुण्याला जेवण देता यावे व वाटसरूला आधार देता  यावा म्हणून.'
                                                                                                                                    - तिरुवल्लुवर

 वरील सदविचार प्रसिद्ध तामिळ लेखक तिरुवल्लुवर  यांचे आहेत. त्यांच्या 'कुरल' या ग्रंथात अंकित केलेला वरील एक विचार, असे अनेक विचार  त्यांनी या ग्रंथात लिहिले आहेत. सध्या वन आणि टु बी एच के च्या धडपडीत माणूस  मरे तोवर कष्ट करतो पण वरील साध्या गोष्टीची यत्किंचित जाणीव हि त्याला नसते.

 जेव्हा साध्यापेक्षा साधन हावी होत तेव्हा माणूस खरया आनंदा पासून दूर होत जातो. म्हणून साधन प्राप्त करा पण साध्य  विसरू नका, आणि हिच शिकवण ज्येष्ठ लोकांनी सांगितली आहे. तेव्हा तीचा आदर करा आणि जीवनाचा  खरा आनंद घ्या.

Sunday 6 April 2014

असंतोष

असंतोष... एक मानसिक अवस्था. असंतोष दोन प्रकारत विभाजित होऊ शकतो, सकारात्मक असंतोष आणि नकारात्मक असंतोष. सकारात्मक असंतोष  हा स्वकेन्द्री असतो जिथे व्यक्ती स्वतः आणि आसपासच्या वैयक्तिक वर्तुळा संबंधी अधिक सुधारणेच्या हेतूने असंतुष्ट असतो.

याउलट नकारात्मक असंतोष समाज केन्द्री असतो. जिथे व्यक्ती हि समाजाचा भाग बनते आणि सामाजिक सुधारणे संदर्भात असंतुष्ट असते पण या असंतोषाचा एक तोटा असा कि तिथे वैयक्तिक स्वार्थाच विभाजन झाल्याने सुधारणेची भावना टिकात्मक दृष्टीकोन घेतो.

म्हणून सामाजिक असंतोष नाहिसा करायचा असेल तर समाजात राष्ट्र आणि धर्माबद्दल अस्मिता निर्माण करणे आवश्यक आहे. अस्मिता स्वाभिमान जागृत करते आणि स्वाभिमान जबाबदारीची जाणीव निर्माण करतो आणि समाजात सुधारणेची भावना विकसित होते.  


Saturday 5 April 2014

सत्संग

माणसाला सार्वजनिक जीवनात सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संग म्हणजे तुमच्या आतील मूळ अध्यात्मिक आणि मानसिक शांततेला आव्हान करण्याची प्रक्रिया.

नेमस्त जीवनात काम आणि घर या दोन बिंदुवरच केलेले आवागमन खचितच मानसिक शांतता देईल, पण एक सत्संग जी उर्जा देईल ती कदाचित तुमच्या अंतरात्म्याला साद घालण्यास पुरेशी ठरेल.

महासत्संग 
परम पुज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात 

तारीख : ५ एप्रिल २०१४ 
वेळ : सायंकाळी  ६. ३० वाजता 
स्थळ : बालेवाडी स्टेडियम, पुणे  
आमंत्रण : सार्वजनिक

Friday 4 April 2014

पाच वर्ष नमस्कार

एक पक्ष, एक चेहरा- अब की बार एक सरकार

नवा चेहरा, जुना पक्ष- फिर एक बार हमारी सरकार

नवा चेहरा, नवा पक्ष- बदलाव लायेंगे इस बार

झोपलेले मतदार, जाहिरातींची भरमार

कोणाच सरकार अन कोण मतदार?

आश्वासनांनचा भडीमार आणि मी सच्चा उमेदवार

एकदा निवडून द्या मला म्हणजे पाच वर्ष नमस्कार....  

Thursday 3 April 2014

सत्यशोधक - ९

समारोप 

काळाच्या अभ्यासापेक्षाही काळ समजून घेण आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीच मूळ समजून घेण्यासाठी आधी तिची सर्वसाधारण  संकल्पना समजून घेण आवश्यक  असत.

काळाची मूळ संकल्पना प्रवाहीपणाची आहे. काळाच्या प्रवाहीपणाची संकल्पना जर आपण आपल्या मनात रुजवली व त्यानंतर काळाचा अभ्यास करून त्याचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल.

काळच जर आपल्या अस्तित्वाच प्रमुख कारण आहे तर आपण त्याचा अधिक अभ्यास करून व त्याची रहस्यमय पदरे उलगडून आपल्या अस्तित्वाच रहस्य नक्कीच शोधून काढू, व जे पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व  यथार्तपणे सिद्ध करू.... कारण  आपण म्हणजे स्वयं काळच आहोत, सर्वशक्तिमान, मुक्तचैतन्य, अनादी, अनंत...


समाप्ती 

Tuesday 1 April 2014

सत्यशोधक - ८

वेदांच अद्वैत तत्वज्ञान आणि काळ 

 अद्वैत तत्वज्ञान म्हणजे अशी विचारसरणी की, सृष्टीत अस्तित्वात असणारी समस्त जीवसृष्टी एकाचा अंश आहे किंवा परस्परात कोणताही भेद नसणे. अर्थात अहंबोध न ठेवता इतरात परमेश्वर पाहणे. काळ आणि या अद्वैत तत्वज्ञानाची सांगड घालून सांगायच तर ;

आपण सर्वजण काळाचीच निर्मिती अथवा त्याचाच एक अंश आहोत. म्हणजेच  आपल्याला परस्परात भेद  मानण्याचे काहीच कारण नाही. आपल्यातसुद्धा  प्रचंड  शक्तीचा स्त्रोत आहे व काळाप्रमाणेच आपण अनादी म्हणजे ज्याचा  कधी ही जन्म झाला नव्हता व अनंत म्हणजे ज्याचा शेवट नाही असे आहोत. व हेच तत्वज्ञान हिंदु धर्मात आत्म्याच्या आधारे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकंदरीत आपण स्वयं  काळ आहोत व समस्त सृष्टीत आपलाच आत्मा व्यापून राहिला आहे.    

सत्यशोधक - ७

 काळ आणि आपण

आता  पर्यंतच्या स्पष्टीकरनानंतर काळाची संकल्पना  स्पष्ट झाली असेल. काळाने भूत, वर्तमान, भविष्य सर्वकाही व्याप्त आहे. असा हा काळ सार्वकालिक आहे, बंधन रहित व सृजनशीलतेची उत्कटता आहे व आपण सुद्धा काळाचे अंश असल्यामुळे आपल्यातसुद्धा या गुणांचे अविष्करण झालेले दिसून येईल.

उदाहरण द्यायच तर आपण आपल्या मनाद्वारे भूत, वर्तमान व भविष्यात संचार करतो. तसेच वस्तुतः सर्व जीव बंधमुक्त आहेत परंतु संसाराच रहाटगाड सुरळीत चालावं यासाठी आपण स्वतःवर बंधन घातली आहेत. परंतु आपण निर्बंध आहोत हि संकल्पना जर आपण सूक्ष्मपणे तेवत ठेवली तर आपण नक्कीच अधिक उत्कर्षापर्यंत पोहोचून आपल्याला सत्यप्रकाश दिसेल.