Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday, 10 February 2014

जन पळभर म्हणतील हाय हाय....

सध्याचा राजकीय गदारोळ पाहता स्वामी विवेकानंदांचे एक प्रसिद्ध वाक्य आठवत " कुठल्याही कार्याची सुरुवात पहिल्यांदा टीकेने होते, आणि नंतर तिचा स्वीकार केला जातो''

ही एक जनरीतच आहे. लोकपाल विधेयक मंजूर व्हाव या हेतूने अण्णांनी आंदोलन केल तेंव्हा विद्यमान सरकारने त्यांना अटकच केली नाहीतर त्यांच्यावर भल भलते आरोपही केले.

पण शेवटी काय झाल? सरकारला त्यांच्या कलेने केलेले  का होईना लोकपाल विधेयक मंजूर कराव लागल. ते विधेयक आणखी कड़क आणि कायदेशीर व्हाव यासाठी सध्या केजरीवाल कार्यरत आहेत. 

आणि जनरीति प्रमाणे त्यांच्यावर टिकाही होत आहे, पण ही तर फ़क्त पहिली पायरी आहे. 'आप' आग्रही असलेल्या मजबूत लोकपाल बिलाचाही नक्कीच स्वीकार होईल यात शंका नाही.

म्हणूनच कदाचित काल जेंव्हा केजरीवाल यांनी अण्णांची भेट घेतली तेंव्हा अण्णांनी त्यांना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला आहे. त्यांना विश्वास आहे हे ही दिवस जातील, कारण लाटांच अस्तित्व कधीच कायम नसत.

No comments:

Post a Comment