शेवटी श्रीकर परदेशी यांची बदली झालीच. ज्यांच्या कडे दाद मागायची त्यांनीच केली, आणि त्यात आपण जर जनता जनार्दन म्हणून या गोष्टीचा निषेध केला नाही तर आपणही अन्यायला न्याय देणारे ठरू.
शाळेत असताना आम्हाला नागनाथ कोत्तापल्ले यांचा 'दाद' नावाचा एक धडा होता त्यात एका गरीब मुलाची बकरी गावातील पाटलाचा मुलगा काही आडदांडा बरोबर बळजबरीने फस्त करतो...
तो मुलगा गावात पाटलाकडे न्याय मिळेल या आशेने जातो... पण त्याची निराशा होते... गावातील लोकही पाठ फिरवतात.... शेवटी निराशेने तो मरतो.... आणि विडंबना ही की लोक त्याच्या समाधीला शेंदुर फासुन त्याला बकरोबाची समाधी म्हणून नाव देतात.... आणि वर त्याला खुश करण्यासाठी बकरयाचा बळीही....
त्यावेळी मी ही कविता केली. पण खरच वाटल नव्हत लोक असे असतात म्हणून पण आज समजते ती समजाचे भीषण वास्तव मांडणारी एक रूपक कथा होती. ही कविता मी त्या सर्व राजकीय नेत्यांना समर्पित करतो कदाचित ते आम्हांला न्याय देतील नाहीतर समाधी आहेच (यावेळी आमची नाही... तुमची. )
दाद
दाद मागसी कुणाला
न्याय देती कुणास
भोळी भाबडी हि जनता
न्याय देती अन्यायास
दगडासी माने देव
शेंदुर फासुनिया
नवस करी दगडास
पावे म्हनुनिया
बळी तो कान पिळी
करी स्वतःची मनमानी
न्यायास थारा नाही
अन्यायाला तारी
No comments:
Post a Comment