Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday, 9 February 2014

जागृति

'आयुक्तांच्या' बदली विरोधात पिंपरी चिंचवडकरानी जो उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे तो पाहता सध्या नागरिक किती सजग आणि जागरूक झाले आहेत हे लक्षात येत.

पूर्वी प्रमाणे आंदोलनाच स्वरुप असामाईक न राहता ते सामाईक तर झाल आहेच, परंतु त्याचा विस्तार आणि अवाकाही वाढला आहे.

जनते मध्ये ही जागृति निर्माण व्हायला बरेच घटक कारणीभूत आहेत त्यातील सर्वात महत्वाच कारण म्हणजे भ्रष्टाचाराने ओलांडलेली पातळी.

अन्ना हजारेंनी केलेले आंदोलन ही ठिणगी होती आणि त्या ठिणगीनेच आता वनव्याच प्रचंड रूप घेतल आहे, जे देशातील भ्रष्ट नीति खाक करतील आणि निवडक जनप्रतिनिधींची अरेरावीही.

लवकरच देशात परिवर्तनाची लाट येईल यात शंका नाही आणि निवडणूक ही सत्ता सम्पादनची पायरी न राहता लोकाभिमुख शासनाची नांदी ठरेल.

सामन्यातील कोणालाही लोकप्रतिनिधि म्हणून उभे राहताना कोणाच्या हाताची नाही तर निव्वळ जनतेच्या पाठिंब्याची, आपल्या पाठिंब्याची गरज असेल.

जेंव्हा देशाची राजनीती व्यक्तिकेंद्री न राहता जनकेंद्री होईल तो खरा सुदिन आणि ती वेळ आता येऊन ठेपली आहे.

No comments:

Post a Comment