Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Thursday, 20 February 2014

यम धर्माचा अस्त

सध्या राजीव गांधी मारेकरयांच प्रकरण फारच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वीच फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला उशीर झाल्याच कारण देत त्या तिन्ही मारेकरयांच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्यात आल आहे.

अफजल गुरूच्या शिक्षेच्या सन्धर्भातही असच काहिस वळण लागणार होत पण सुदैवाने तस घडल नाही, पण वरील घटना ही काही कमी दुर्दैवी नाही. ज्या देशात स्वयं पंतप्रधानांच्या मारेकरयांची शिक्षा सौम्य केली जाते आणि संसद भवनसारख्या राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालनारया अतिरेक्याच्या दया अर्जावर व्यर्थ काथ्या कुट केला जातो तिथल्या जनतेवर याचा काय परिणाम होत असेल ?

सत्ताकारन लक्षात घेऊन फ़क्त एखाद्या विशिष्ठ गटाला किंवा राज्यातील लोकांना खुश करण्यासाठी देशाच्या सार्वभौम घटना आणि न्याय व्यवस्थेशी ही जी काही तडजोड होत आहे ती फारच खेदजनक आहे आणि उद्या या घटनाच आपल्या अंगलट येऊ शकतील.

आजचा स्वतंत्र तेलंगाना मुद्दा असो, मराठा आरक्षण असो, कश्मीरचे विशिष्ट कलम असो किंवा ईशान्य भारतीयांशी दुजाभाव ही तर फक्त येणारया  अराजकाची बीजे आहेत. का म्हणून कोणी न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करावा ज्यांच्या हातात आपण मोठया विश्वासाने तराजू दिला आहे त्यांना त्यांच काम करू दया.

उलट न्याय पालिकेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्र सरकारलाही असता कामा नये परंतु दुर्दैवाने भारतात तो दिसून येतो. आणि ज्या देशात न्याय पालिका स्वतंत्र आणि हस्तक्षेप विरहित नाही तिथे अराजक पसरायला वेळ लागत नाही आणि आज आपण ते पाहतोय. 

सावधान यम धर्म अस्त पावत आहे.…

No comments:

Post a Comment