पूर्वी कधीतरी मी अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून मुक्तीची सोपी व्याख्या ऐकली होती, 'शाळेतला एखादा मुलगा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन बाहेर पडतो आणि सुटकेचा दिर्घ निश्वास टाकतो ती मुक्ति'
किती सोपी व्याख्या...
पण आज वर्ष उलटून गेली आहेत मनाची जाणीव ही थोड़ी प्रगल्भ झाली आहे आणि ती मुक्तीची व्याख्याही आताशा समाधान करत नाही. तो वार्षिक परीक्षा पास झालेला मुलगा जेंव्हा पुढच्या वर्गात जायची स्वप्न पाहतो तेव्हाच त्याची मुक्ति बंधनात परिवर्तित होत असते.
शाळेनंतर नोकरीची, नोकरीनंतर कुटुंबाची नंतर मुलांची प्रत्येक गोष्टीची आस... जणू साखळीच तयार होते. आणि हीच साखळी केंव्हा पायात पड़ते हे कळत सुद्धा नाही आणि आश्चर्य म्हणजे मुक्तिपेक्षा याच बंधनात आपल्याला आनंद वाटत असतो.
किती सोपी व्याख्या...
पण आज वर्ष उलटून गेली आहेत मनाची जाणीव ही थोड़ी प्रगल्भ झाली आहे आणि ती मुक्तीची व्याख्याही आताशा समाधान करत नाही. तो वार्षिक परीक्षा पास झालेला मुलगा जेंव्हा पुढच्या वर्गात जायची स्वप्न पाहतो तेव्हाच त्याची मुक्ति बंधनात परिवर्तित होत असते.
शाळेनंतर नोकरीची, नोकरीनंतर कुटुंबाची नंतर मुलांची प्रत्येक गोष्टीची आस... जणू साखळीच तयार होते. आणि हीच साखळी केंव्हा पायात पड़ते हे कळत सुद्धा नाही आणि आश्चर्य म्हणजे मुक्तिपेक्षा याच बंधनात आपल्याला आनंद वाटत असतो.
No comments:
Post a Comment