Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Wednesday, 12 February 2014

राजमार्ग

कुठल्याही कार्यासाठी जनतेला प्रोत्साहित करुन त्यांना कार्यप्रवृत्त करणे ही फारच अवघड गोष्ट आहे, पण ज्यांच्याकडे वक्तृत्वकौशल्य आहे त्यांच्यासाठी हा फक्त खेळ असतो.

राज ठाकरे ही प्रभूति या खेळातील महारथी आहे आणि आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे ते अर्ध्वयु आहेत. जनतेला चेतवन्याची जी क्षमता राज ठाकरेंकडे आहे ती सध्या कुठल्याही राजकीय नेत्याकडे नाही.

त्यांच्या कार्यात आणि सभेत जो धड़ाका असतो तो इतरत्र कोठेही पहायला मिळणार नाही, आजच्या टोल विरोधी आंदोलनाचे जे परिणाम होतील ते शक्यतो सकारात्मकच व्हावेत हीच इच्छा.

खरतर जनतेचा पूर्वी टोल साठी विरोध नव्हता, परंतु त्यातील पारदर्शकतेचा अभाव आजच्या असंतोषाला कारणीभूत आहे. राज ठाकरे यांनी तो मुद्दा उपस्तिथ केला ही चांगलीच गोष्ट आहे.

पण या आंदोलनात अस्थाई तत्ववर काम करणारया टोलवरील  कर्मचार्यांना मारहाणीचा त्रास होउ नये याची काळजी घेण पक्षाची जबाबदारी आहे आणि तोच पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी राजमार्ग असेल.

No comments:

Post a Comment