Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday, 16 February 2014

गृहीत बांधव

आज एका विचित्र बातमीकडे लक्ष गेल. 'ताज महल' पाहण्यासाठी गेलेल्या अपंगांना तेथील सुरक्षा रक्षाकानी मज्जाव केला, कारण तस चुकिच नव्हत. ताज पाहण्यासाठी तेथे अपंगांसाठीचा रैंप (उतरणीचा मार्ग ) नसून पायरया च आहेत आणि ताज जागतिक वारसा असल्याने तेथील नियम या गोष्टीला मज्जाव करत होता.


पण मुख्य प्रश्न अपंगांना मज्जाव नसून त्यांच्या सोयीसाठी रैंपची व्यवस्था का करण्यात आली नाही हा आहे. कि आपण अपंगांना एव्हढ गृहीत धरल आहे कि आपण त्यांचा विचारच करू नये.

 जागतिक वारसा स्थळे अपवाद झाला, पण बरयाच कॉर्पोरेट ऑफिस तसेच सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्स ही रैंप विरहित आहेत आणि अशा ठिकाणी जेंव्हा त्यांना असहाय पाहतो तेंव्हा फार वाईट वाटत.

वाईट त्यांच्या अपंगत्वाच नाही तर त्यांच्यासाठीच्या एका साधारण सोयीच्या अभावाच वाटत. आज भारताची लोकसंख्या एव्हढी प्रचंड आहे कि आपण ज्या आपल्या अपंग बांधवांची संख्या काही टक्क्यांमधेच मानली तरी त्यांची संख्या कोटींच्या घरात जाईल.

तेंव्हा त्यांच्या या साधारण परंतु महत्वपूर्ण गरजेची पूर्तता व्हायलाच हवी कारण आपल्या लोकशाही प्रधान  देशात प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो एका साधारण गृहितकावर अवलंबून राहता कामा नये.

No comments:

Post a Comment