Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Friday 17 January 2014

भावाचे भुकेले

सर्वोच्च न्यायालयाने शेवटी पंढरपूरच्या विठठल मंदिरातील बडवे आणि उत्पात यांची मध्यस्थी आणि हक्क काढुन घेत सरकारकडे वर्ग केले.

निश्चितच हा एक चांगला संकेत आहे पण परंपरागत बडवे जाऊन त्यांच्या जागी सरकारी बडवे येऊ नये म्हणजे समस्त वारकरयाना खरया अर्थाने विठठल पावेल.

तस पहायला गेल तर ही फार जुनी परंपरा आहे पण  परंपरेचे पाईक म्हणजे आजचे उत्पात आणि बडवे यांनी जर कालानुरूप पाउले उचलली असती तर कदाचित ही वेळ टळु शकली असती.

आपल्या समाजातही असेच राजकीय मध्यस्त आहेत जे जनतेच्या विकास आणि प्रगति रूपी देवाला भेटु देत नाहीत, मंदिरातील बडवे गेलेत आता ह्यांची वेळ आली आहे.

तस पाहिल तर देव आणि जनता हे नेहमीच भावाचे भुकेले असतात यांची जो चांगल्या भावाने सेवा करतो तो खरा भक्त तो खरा नेता.

बोला पुंडलिक वर्दे हरी विठठल..........श्री ज्ञानदेव तुकाराम........   

No comments:

Post a Comment