सध्या मता मतांचा गलबला फार वाढला आहे. प्रत्येकाचा एकाच प्रश्नावर वेगवेगळा दृष्टिकोण आढळून येतो. अस म्हणतात माणसावर अनुवंशिकतेचा परिणाम फार असतो, त्यामुळेच कदाचित अस होत असाव.
तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत याचा उल्लेख अतिशय सुरेख शब्दात एका अभंगातून केला आहे;
पहा हो देवा कैसे जन। भिन्न भिन्नसंचिते।।१ ।।
एक नाही एका ऐसे। दावी कैसे शुद्ध हीन ।।२।।
पंचभूते एका राशी। सुत्रे कैसी ओळखावी ।।३ ।।
तुका म्हणे जो जे जाती। त्याची स्तिथी तैशी ते ।।४ ।।
वरील अभंगातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीही माणसाची वृत्ति आजच्याहुन काही विशेष भिन्न नव्हती.पांडुरंग हरी.… पांडुरंग हरी..
तुकाराम महाराजांनी त्यांच्या गाथेत याचा उल्लेख अतिशय सुरेख शब्दात एका अभंगातून केला आहे;
पहा हो देवा कैसे जन। भिन्न भिन्नसंचिते।।१ ।।
एक नाही एका ऐसे। दावी कैसे शुद्ध हीन ।।२।।
पंचभूते एका राशी। सुत्रे कैसी ओळखावी ।।३ ।।
तुका म्हणे जो जे जाती। त्याची स्तिथी तैशी ते ।।४ ।।
वरील अभंगातून आणखी एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीही माणसाची वृत्ति आजच्याहुन काही विशेष भिन्न नव्हती.पांडुरंग हरी.… पांडुरंग हरी..
No comments:
Post a Comment