Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Thursday 23 January 2014

कायद्याच बोला

दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना हटवण्याची मागणी सध्या विरोधी पक्ष आणि मीडिया कडून जोरावर आहे, कारण १५ जानेवारी रोजी त्यांनी जमावाला बरोबर घेऊन दिल्लीस्थित युगांडाच्या मुलनिवासी महिलेच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.

इथे आरोपात तथ्य आहे अथवा नाही हा भाग अलाहिदा पण मुख्य प्रश्न असा आहे कि त्या महिलेच्या घरावर छापा टाकण्याची गरज का पडली? कारण ती महिला ड्रग रैकेट चालवत होती आणि हे भारतातील उघड़ सत्य आहे कि अफ्रीकी देशातून आलेले नागरिक अथवा विद्यार्थी सम्भवतः ड्रग्स डीलिंग मधे सक्रिय आहेत.

मग प्रार्थमिकतेचा रोख सोमनाथ भारती नसून ती महिला हवी. तिच्याकडे ड्रग्स सापडले असतील तर तिच्यावर कारवाई व्हायला हवी. असल्या वर- वर च्या वादात स्कूप शोधण्यापेक्षा मीडिया ने मुळ मुद्द्याला हात घालायला हवा कारण देशाची मुळ समस्या करवाईचे स्वरुप नसून कारवाईस दिरंगाई हा आहे.

राहता राहिला प्रश्न महिला आयोगाचा, त्यांनीही आपण कोणाचा स्टॅंड घेत आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे एका अबला आणि निराधार महिलेची बाजू घेणे वेगळ तसेच परदेशातील बेकायदेशीर घडामोडीत लिप्त महिलेची बाजु घेण वेगळ हे त्यांना समजायला हव फ़क्त ती महिला आहे म्हणून.... या मुद्द्याला अर्थ राहत नाही.

तसेच गोव्यात बेकायदेशीर रित्या राहणारया अफ्रीकी निवासींवर कारवाईचा बडगा उगरताच त्यांनी केलेल्या दंगलींचे उदाहरणही ताजेच आहे. तेंव्हा 'आप' ल्यातीलच एका ईमानदार व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा परदेशातील गुन्हेगारांवर (महिला असली तरी) कारवाई करण केव्हाही श्रेयस्कर.

No comments:

Post a Comment