Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 18 January 2014

स्वयंशासित गर्दी

काल रात्री बोहरा समाजातील धर्मगुरूंच्या अंतिम संस्काराला आलेल्या लोकांमधे अचानक कोलाहल माजून अठरा लोक मृत्यु पावले. 

भारतात घडलेली अशी ही एक मात्र घटना नाही या आधीही काही महिन्यापूर्वीच झारखण्ड भागात एका तीर्थ स्थळावर पुल तुटल्याच्या अफवेने शेकडो लोकांचा बळी घेतला तसेच मांढरदेवी दुर्घटना ही काही विशेष जुनी नाही पण आजतागायत अशा घटना घडतच आहेत.

भारत हा उत्सव प्रिय देश आहे आणि इथे छोट्या मोठ्या उत्सवात गर्दी फार होते, अशा वेळी गर्दिवर नियंत्रण ही सरकारची प्राथमिकता हवी. फक्त गर्दिवर नियंत्रण ठेवणारया भरमसाठ पथकाऐवजी शास्त्र शुद्ध रित्या प्रशिक्षित थोड्याच लोकांचे पथक जास्त कारगर ठरेल. तसेच अशा घटना घडण्यामागील प्रमुख कारण म्हणजे 'अफवा'.... यावर आळा घालणे खरतर अवघड गोष्ट आहे, यासाठी लोकांच्यातच अशा गर्दीच्या ठिकाणी स्वयंशिस्त गरजेची आहे.

कारण गर्दिवर एकवेळ नियंत्रण ठेवता येऊ शकत पण तिला काबूत ठेवणे प्रचंड अवघड आहे यासाठी लोकांनीच अशा गर्दीच्या ठिकाणी अफवेला थारा देऊ नये हा अशा प्रकारच्या घटनेवरील रामबाण उपाय आहे.

No comments:

Post a Comment