'भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र' (Indian Space Research Organisation) ज्या प्रकारे अंतराष्ट्रीय स्तरावर भारताच नाव उज्वल करत आहे, त्यावरून अस अनुमान निघु शकत की भारताला इतर संयुक्त राष्ट्रे फ़क्त एक प्रगतिशील राष्ट्र म्हणूनच ग्राह्य धरु शकत नाही तर त्यांना जाणीव करुन देतो की भारत अद्यायवत तंत्रज्ञानात अर्थपुर्ण भूमिकाही बजाऊ शकतो.
डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना आपण भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक मानतो त्यांनी १९६९ साली केलेल्या भाषणात विदीत केल होत की,"आमच्यासाठी ध्येयाप्रती कोणतीही द्विधा अवस्था नाहीये. चंद्र किंवा इतर ग्रहांवरील मोहिमा अथवा मानवी अंतरिक्ष उड्डाण याकरिता आर्थिक दृष्टीने पुढारलेल्या देशांशी स्पर्धा करण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. पण आम्हाला विश्वास आहे की जर आम्हाला राष्ट्रीय आणि संयुक्त राष्ट्रीय दृष्टया महत्वपूर्ण भूमिका बजवायची असेल, तर आम्हाला काहीच नाही तर दुसरया स्थानावरून मानवीय आणि सामाजिक अडचणीसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा अंमल करावा लागेल."
२०१३ सालच 'मार्स ऑर्बिट मिशन' आणि आताच्या 'जी एस एल व्ही डी ५' या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर असलेल्या प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण हे दोन अवकाशीय कार्यक्रम डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या भाषणाला पृष्टि देतात तसेच 'मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश तंत्रज्ञान' या 'इस्रोच्या' बोधवाक्याला ही जागतात. भारताच्या राजकीय उलथा-पालथीत संशोधन प्रकल्पांची अशी स्थिरता आणि प्रगति निश्चितच प्रशंसनीय आहे.
डॉक्टर विक्रम साराभाई, ज्यांना आपण भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक मानतो त्यांनी १९६९ साली केलेल्या भाषणात विदीत केल होत की,"आमच्यासाठी ध्येयाप्रती कोणतीही द्विधा अवस्था नाहीये. चंद्र किंवा इतर ग्रहांवरील मोहिमा अथवा मानवी अंतरिक्ष उड्डाण याकरिता आर्थिक दृष्टीने पुढारलेल्या देशांशी स्पर्धा करण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. पण आम्हाला विश्वास आहे की जर आम्हाला राष्ट्रीय आणि संयुक्त राष्ट्रीय दृष्टया महत्वपूर्ण भूमिका बजवायची असेल, तर आम्हाला काहीच नाही तर दुसरया स्थानावरून मानवीय आणि सामाजिक अडचणीसाठी आधुनिक तंत्र ज्ञानाचा अंमल करावा लागेल."
२०१३ सालच 'मार्स ऑर्बिट मिशन' आणि आताच्या 'जी एस एल व्ही डी ५' या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर असलेल्या प्रक्षेपकाचे यशस्वी उड्डाण हे दोन अवकाशीय कार्यक्रम डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या भाषणाला पृष्टि देतात तसेच 'मानव जातीच्या सेवेसाठी अवकाश तंत्रज्ञान' या 'इस्रोच्या' बोधवाक्याला ही जागतात. भारताच्या राजकीय उलथा-पालथीत संशोधन प्रकल्पांची अशी स्थिरता आणि प्रगति निश्चितच प्रशंसनीय आहे.
No comments:
Post a Comment