Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 5 January 2014

व्यक्ति केंद्री

सध्या भारतीय राजकारणात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी दोन व्यक्ति चांगल्याच केंद्रस्थानी आल्या आहेत सांगण्याची आवश्यकता नाही राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यात भर म्हणून मीडिया ने अरविन्द केजरीवाल यांनाही या व्यक्ति केंद्री युद्धात सामिल केल आहे.

भारतीय राजकरणाची आणि पर्यायाने लोकशाहीची ही फार मोठी शोकांतिका आहे, इथे लोक तत्वांऐवजी व्यक्ति पूजतात म्हणूनच इथे आमदारचा मुलगा/मुलगी आमदार होतात, मोठ मोठ्या पक्षांचे वारस संस्थापकांच्या घरातलेच असतात भलेही त्यांना अनुभव असो वा नसो मग लोकशाहीला अर्थच काय?आणि सामान्य लोकांना संधि मिळणार तरी कधी?

इथे राजकीय नेत्यांना दोष देण्यात अर्थ नाही आपल्यालाच आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आपली निष्ठा नेहमीच तत्वांशी असावी व्यक्तीशी नव्हे कारण  व्यक्तिंमधे स्वार्थ आढळतो तत्वांमधे नाही तत्व मग ती भलेही कोणत्या का पक्षाची असेनात उमेदवार निवडतानाही तो कोणाचा यापेक्षा काय आहे याला महत्व देण्यात याव.

वर सांगितल्याप्रमाणे संधी मिळणार नसेल तर आपल्याला ती निर्माण करावी लागेल, का म्हणून आपण आपल्यातल्याच एखादया ईमानदार नेतृत्वाला संधी देऊ नये भलेही मग तो अपक्ष का असेना, मग तो उमेदवार कोणी का असेना, प्रत्यक्षात तुम्हीही... हो, हा ब्लॉग वाचनारे तुम्ही. अलबत राजकरणा ऐवजी समाजकारण करणार असाल तर...

 

No comments:

Post a Comment