Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 26 January 2014

प्रजासत्ता

आज २६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस. भारतातील नागरिकांना या दिवशी राज्यघटना मंजूर करुन खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग मोकळा करण्यात आला.

पण ६५ वर्षात लोकशाहीतुन भारतीय जनतेला कितपत फायदा झाला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हुकुमशाही किंवा राजेशाही पद्धतीत एकाधिकार सर्व मान्य असतो परंतु लोकशाहीत जनतेच राज्य असत असे म्हणतात, पण यात कितपत तथ्य आहे?

अर्थात लोकशाही निर्विवादपणे सर्वात जास्त न्याय्य पद्धति आहे. पण तेव्हा, जेव्हा ती चालवणारे वैयक्तिक आकांशा आणि स्वार्थ बाजुला सारून जनतेच्या हिताला प्राधान्य देतील तेव्हा. जर जनतेलाच नजरअंदाज केल तर ती फक्त लोकशाहीच्या बुरख्या आडची हुकुमशाही ठरू शकते.

दुर्दैवाने भारतात लोकशाही नामधारी होण्याच्या वाटेवर आहे कारण भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा सुकाळ आहे. जर आपण मतदार या नात्याने सदविवेकबुद्धीचा वापर करुन फक्त  योग्य उमेदवाराला निवडून दिल तरच आपण आपल्यासाठी खरया अर्थाने लोकशाहीचा मार्ग प्रशस्त करू शकू.  जय हिन्द!      

No comments:

Post a Comment