Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 16 March 2014

बळीराजाचा बळी

मराठवाडा,विदर्भ या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरयांच जे आतोनात नुकसान झाल आहे ते पाहून कोणाचहि हृदय पिळवटून निघेल.

मुलाबाळा प्रमाणे जपलेली पिक जेव्हा एका दिवसात आडवी  होतात तेव्हा त्या शेतकऱयाला काय वाटत असेल? ज्या पिकांच्या भरवश्यावर त्याने बँकेतून लाखांनी कर्ज घेतल असत ते फेडण्याची विवंचना तर  असतेच, पण त्याहूनहि ती निसर्गा समोरची हतबलता काळीज कुरतडणारी असते.

मग अशा  स्तिथीत तो आत्महत्येचा मार्ग  पत्करतो.काही दिवसांनी सरकार शेतकऱयाच कर्ज माफ  करते, पण तोपर्यंत एका प्राणाची आहुती पडली असते. मग त्याच शेतकऱ्याचा मुलगा आपल्या कुटुंबासाठी नवी सुरुवात  करतो, आणि त्यासाठी जेव्हा तो पुन्हा बँकेची वाट पकडतो तेव्हा त्या चक्राची नांदी पुन्हा चाहूल देऊ लागते.

सरकार....! आता तरी जागे व्हा. अनुदान द्या..... हे दान नाही, हक्क आहे शेतकऱयांचा. त्यांना सहानुभूती नकोय.... संरक्षण हवय....बळीराजाचा बळी जातोय तो थांबवा.   

No comments:

Post a Comment