Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Sunday 30 March 2014

सत्यशोधक - ५

काळाच्या अमर्यादित शक्तीचा दाता कोण ?

मागील प्रकरणाच्या स्पष्टीकरणानंतर हा प्रश्न तसा व्यर्थ आहे. काळाच्या शक्तीला कोणीही दाता नाही उलट काळातूनच शक्ती प्रस्तुत होते व त्यामुळेच काळाच्या शक्तीचा कोणी दाता नसून काळ हाच शक्तीचा दाता आहे. चार प्रकरणांच्या सम्पुष्टीनंतर  वाचकांच्या मनात एक प्रश्न आला असेल कि या लेखमालेत काळालाच कोणत्याही व्युत्पत्तीचा पाया का मनाला आहे?

तर उपरोक्त शंकेचे समाधान असे कि, तुम्ही अशी कल्पना करा कि अखिल ब्रह्मांडात काहीही नाही म्हणजे असतील नसतील तेव्हढे ग्रह, तारे, सूर्य, चंन्द्र व इतर अनेक लहान मोठे घटक एव्हढेच नव्हे तर ब्रम्हांडाच अस्तित्वच काही काळाकरीता बाजूला ठेवा तुम्हाला अस्वस्थ करणारी पोकळी अथवा पोकळी हि संज्ञाहि जिथे फिकी पडेल असे जे काही जाणवत आहे ह्या अवस्थेतच आपण काळाच अस्तित्व समजू शकतो. पूर्वी सांगितल्याप्रमाणे काळ हा प्रवाही आहे.

आता हि प्रवाहीपणाची गोष्ट नीट स्मरून त्या अवस्थेतच विचार करा कि आपण ज्या अवस्थेत आहोत तेथेही काळ प्रवाही आहे तो थांबलेला नाही कारण तो प्रवाही आहे म्हणूनच पुढे अखिल ब्रम्हांड निर्माण होणार आहे व त्या ब्राम्हंडात अगणित तारे, तारका, ग्रह, सुर्य, चंद्र व त्या अनुषंगाने परिस्तिथी व पोकळी यांच्या संयोगाने निर्माण होणारया हवा, ध्वनी, प्रकाश इत्यादी कार्यकारणिक गोष्टी निर्माण होणार आहेत.

वरील अवस्थेच्या अनुभवानंतर एक गोष्ट लक्षात आली असेल कि जेव्हा आपण काही नाहीची कल्पना करतो तेव्हासुद्धा काळ प्रवाही असतो. त्या शिवाय का आपण अस म्हणू शकतो कि मी हा अनुभव घेतला, कारण अनुभव घेते वेळीसुद्धा जो काही तुमचा काळ निघून जातो तोच काळाची साक्ष पटवून देण्यास समर्थ आहे. म्हणूनच काळ हा सदैव व निरंतर प्रवाही आहे व त्याला आदी, मध्य व अंत नाही आणि त्यामुळेच काळ हा समस्त  सृष्टीचा आद्यकारण आहे .

No comments:

Post a Comment