Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Thursday 13 March 2014

शस्त्र आणि वाद

जगातील ११५ देशांपैकी १५ प्रमुख अण्वस्त्रधारी देश आहेत.भारतातर्फे १९८८ दरम्यान अण्वस्त्रबंदीचे प्रथमोच्चरण पंतप्रधान राजीव गांधी यांनी केले.परस्पर संवादातील कमतरता व एकमेकांबद्दल वाटणारी भीती हि अण्वस्त्र निर्मितीची प्रमुख कारणे आहेत. अमेरिका व रशिया हि अण्वस्त्र निर्मितीत अग्रणी आहेत.

उपरोक्त दोन्ही देश अनुक्रमे भांडवलशाही व साम्यवादी असे कट्टर आहेत. व यातूनच दोन्ही देशात कितीतरी  दशके शीतयुद्ध चालू होते या दोन्ही देशांमध्ये जगातील प्रमुख देश आपल्या बाजूने ओढण्यासाठी धडपड चालू आहे यातूनच कितीतरी देशात वैचारिक दुफळी निर्माण झाली आहे.

एक गट साम्यवादी तर दुसरा कम्युनिस्ट तर तिसरा मार्क्सवादी. या प्रत्येक वादानेच संपुष्टात येणारया पक्षांच्या पायाशी वैचारिक क्रांती आहे, विचारवंत आहेत. परंतु लोक हे विसरतात कि विचारवंताचे विचार हे त्यांच्या बौद्धिक क्षमतेशी सुसंगत असतात व त्या विचारावरही त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टीचा प्रभाव पडत असतो.

यातूनच ज्या लोकांना ज्या विचारवंताचे विचार  पटतात ते लोक एखादा गट स्थापन करतात व आपल्या विचारवंताचाच उदो उदो करतात. त्यांचा इतर जनतेच्या भावविश्वाशी कोणताही संबंध नसतो. म्हणजे आजकाल समाजाचे आयाम बदलले आहेत पण संदर्भ मात्र तेच राहिले आहेत.

पूर्वी धर्माच्या नावाने तंटे होत आता वैचारिक तंटे होत आहेत. यातील प्रत्येक गोष्टीचा निकाल फक्त एका तटस्थ पंचाद्वारे होतो आणि तो म्हणजे शस्त्र ज्यांना कोणतीही जात धर्म नसते किंवा नैतिकतेची बंधने नसतात.आल्या तारखेला होणारे हिंदू-मुस्लिम दंगे काय किंवा काल परवा झारखंडमध्ये झालेले माओवादी अतेरीक्यांचे हल्ले काय यांची पाळेमुळे इतक्या खोलवर आहेत.      

No comments:

Post a Comment