Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Monday 24 March 2014

जमाव

जमाव क्रोधच नाही तर आत्यधिक आनंदात हि हिंसक बनू शकतो. दोन तीन व्यक्तींचा पुढाकार जो चुकीच्या गोष्टींसाठी का असेना इतर अनेक जणांना चेतवतो.

जमावाची विचार प्रक्रिया बौद्धिक नसून भावनिक असते. त्यामुळेच जमावाला अक्कल नसते असे म्हणत असावेत. दंगल, समूह हत्या आणि सामुहिक बलात्कार सारखे गंभीर तर रेगिंग सारखे प्रार्थमिक स्तरावरील किरकोळ गुन्हे इत्यादी या सामरिक मानसिकतेचे प्रतिक आहेत.

अशा परिस्तिथित समाजातील कोणतीही व्यक्ती सापडू शकते. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने आप आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवली तर होणारे अनर्थ टळू शकतात. मग तुम्ही अत्याचारी गटातील एक असा अथवा पिडीत.

होत असलेली घटना चुकीची आहे हे लक्षात आल्यावर त्यातून स्वतः तर बाजूला व्हाच पण आपल्या सहकारयांना हि परावृत्त करा. 

No comments:

Post a Comment