सध्या राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपा संबंधात जे महाभारत सुरु आहे त्यातून आपल्या सारख्या मतदारांना बोध घेण्यासारख बरच काही आहे.
'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे' हा वाकप्रचार अशावेळी आयाराम गयाराम उमेदवारांना चांगलाच लागू होतो. हे जे बहु प्रतिष्ठित उमेदवार ज्यांनी मोठ- मोठाली पदे भूषवली असतात ते त्यांच्या प्रभागातील जनतेच्या बळावर आपल्या पक्षाला हि आपला दास बनवू इच्छीतात.
पूर्वी कधी पक्षाचा झेंडा मिरवणारे हेच उमेदवार जेंव्हा तिकीट वाटपामुळे नाराज होतात तेव्हा त्यांची पक्ष निष्ठा कुठच्या कुठे विरून जाते आणि ते साळसूदपणाचा आव आणत बंडाचा झेंडा उभारतात आणि दुसरया पक्षात सामीलही होतात.
पण त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या मनः स्थितीचा होणारा विचार ते करतात का ? पक्षाच्या तत्वाला बांधील राहुन त्या उमेदवारासाठी राबणाऱया लोकांपुढे कोणता पर्याय राहत असेल याचा विचार ते करतात का? नाही ना... जेव्हा पक्षापेक्षा उमेदवार किंवा नेता मोठा होतो तेव्हा नेहमी अशीच स्थिती निर्माण होते.
तेव्हा मित्रांनो तुम्ही कोणत्या का पक्षाचे असा, पक्षाच्या तत्वाशी बांधील राहा उमेदवाराशी नाही. कारण तत्व नेहमी तशीच राहतात पण माणसे बदलतात. तेव्हा सावधान... राहता राहिला प्रश्न दल बदलू उमेदवारांचा, ते तर आपण दररोज त्यांच्या कोलांट्या उड्या टीव्ही चैनल वर पहातच आहोत ते पाहुन हटकून एक शेर आठवतो ;
बर्बाद गुलिस्तां करने को तो एक हि उल्लु काफी था
यहां हर शाख पे उल्लु बैठा है अंजाम- ए-गुलिस्तां क्या होगा?
'तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे' हा वाकप्रचार अशावेळी आयाराम गयाराम उमेदवारांना चांगलाच लागू होतो. हे जे बहु प्रतिष्ठित उमेदवार ज्यांनी मोठ- मोठाली पदे भूषवली असतात ते त्यांच्या प्रभागातील जनतेच्या बळावर आपल्या पक्षाला हि आपला दास बनवू इच्छीतात.
पूर्वी कधी पक्षाचा झेंडा मिरवणारे हेच उमेदवार जेंव्हा तिकीट वाटपामुळे नाराज होतात तेव्हा त्यांची पक्ष निष्ठा कुठच्या कुठे विरून जाते आणि ते साळसूदपणाचा आव आणत बंडाचा झेंडा उभारतात आणि दुसरया पक्षात सामीलही होतात.
पण त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या मनः स्थितीचा होणारा विचार ते करतात का ? पक्षाच्या तत्वाला बांधील राहुन त्या उमेदवारासाठी राबणाऱया लोकांपुढे कोणता पर्याय राहत असेल याचा विचार ते करतात का? नाही ना... जेव्हा पक्षापेक्षा उमेदवार किंवा नेता मोठा होतो तेव्हा नेहमी अशीच स्थिती निर्माण होते.
तेव्हा मित्रांनो तुम्ही कोणत्या का पक्षाचे असा, पक्षाच्या तत्वाशी बांधील राहा उमेदवाराशी नाही. कारण तत्व नेहमी तशीच राहतात पण माणसे बदलतात. तेव्हा सावधान... राहता राहिला प्रश्न दल बदलू उमेदवारांचा, ते तर आपण दररोज त्यांच्या कोलांट्या उड्या टीव्ही चैनल वर पहातच आहोत ते पाहुन हटकून एक शेर आठवतो ;
बर्बाद गुलिस्तां करने को तो एक हि उल्लु काफी था
यहां हर शाख पे उल्लु बैठा है अंजाम- ए-गुलिस्तां क्या होगा?
No comments:
Post a Comment