महात्मा गांधींना सर्वजण एक अहिंसा प्रधान नेता मानतात. अहिंसा म्हणजे कोणावरही शारीरिक किंवा शाब्दिक प्रतिहल्ला न करणे किंवा कोणी एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणे, हे आणि अस बरच काही....
पण महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा हि अशीच होती का? अहिंसा हि भीरु वृत्ती दर्शवत नाही का? किंवा मग शांतता स्थापित करण्यासाठी निर्माण केलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतंत्र सैन्य दलाची गरज का भासते? इत्यादी प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असतील.
स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात दोन गट होते, जहाल आणि मवाळ. जहाल हे गरज पडल्यास हिंसेचे हि समर्थन करायचे, तर मवाळ हे शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्यावर विशेष भर द्यायचे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे चंद्रशेखर आझाद यांच्या जहाल गटातील होते. आणि हिंसेचे समर्थन करताना भगतसिंग यांनी त्याला स्व-बचाव हे विशेषण दिल.
जर मी म्हणालो, महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा तत्वज्ञानाला भगत सिंग यांच तत्वज्ञान पुरक किंवा समर्थनीय आहे तर.... कदाचित हे विधान विपर्यस्त वाटेल, पण दुर्बळ व्यक्तीच्या अहिंसेपेक्षा सबळ व्यक्तीची अहिंसा केंव्हाही श्रेष्ठ किंवा याच अर्थाने दुर्बळ व्यक्तीची हिंसा हि सबळ व्यक्तीच्या हिंसेपेक्षा समर्थनीय आहे हे खर अहिंसेच तत्वज्ञान.
खोलात जाऊन सांगायचं तर ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने आपल्या सत्तेचा उपयोग न्यायासाठी करावा ना कि जोर जबर्दस्तीसाठी आणि जो निर्बल किंवा जन सामान्य आहे त्याने अन्यायाविरुद्ध दंड थोपटणे हे अहिंसे इतकच समर्थनीय आहे.
म्हणून आज आपण जेव्हढे महात्मा गांधी, विनोबा भावे यांना मानतो तेव्हढेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनाही. आज २३ मार्च शहिद दिवस. आजचा ब्लॉग भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या सर्व जहाल आणि मवाळ क्रांतीकारकांना समर्पित. जय हिंद......
पण महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा हि अशीच होती का? अहिंसा हि भीरु वृत्ती दर्शवत नाही का? किंवा मग शांतता स्थापित करण्यासाठी निर्माण केलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा स्वतंत्र सैन्य दलाची गरज का भासते? इत्यादी प्रश्न कदाचित आपल्या मनात येत असतील.
स्वातंत्र्य पूर्व काळात भारतात दोन गट होते, जहाल आणि मवाळ. जहाल हे गरज पडल्यास हिंसेचे हि समर्थन करायचे, तर मवाळ हे शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्यावर विशेष भर द्यायचे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे चंद्रशेखर आझाद यांच्या जहाल गटातील होते. आणि हिंसेचे समर्थन करताना भगतसिंग यांनी त्याला स्व-बचाव हे विशेषण दिल.
जर मी म्हणालो, महात्मा गांधींना अभिप्रेत अहिंसा तत्वज्ञानाला भगत सिंग यांच तत्वज्ञान पुरक किंवा समर्थनीय आहे तर.... कदाचित हे विधान विपर्यस्त वाटेल, पण दुर्बळ व्यक्तीच्या अहिंसेपेक्षा सबळ व्यक्तीची अहिंसा केंव्हाही श्रेष्ठ किंवा याच अर्थाने दुर्बळ व्यक्तीची हिंसा हि सबळ व्यक्तीच्या हिंसेपेक्षा समर्थनीय आहे हे खर अहिंसेच तत्वज्ञान.
खोलात जाऊन सांगायचं तर ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने आपल्या सत्तेचा उपयोग न्यायासाठी करावा ना कि जोर जबर्दस्तीसाठी आणि जो निर्बल किंवा जन सामान्य आहे त्याने अन्यायाविरुद्ध दंड थोपटणे हे अहिंसे इतकच समर्थनीय आहे.
म्हणून आज आपण जेव्हढे महात्मा गांधी, विनोबा भावे यांना मानतो तेव्हढेच भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनाही. आज २३ मार्च शहिद दिवस. आजचा ब्लॉग भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या सर्व जहाल आणि मवाळ क्रांतीकारकांना समर्पित. जय हिंद......
No comments:
Post a Comment