Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 22 March 2014

गांधारी

हमारा हाथ आम आदमी के साथ, परिवर्तन, तरक्की इत्यादी...  इत्यादी... आणि बरच काही. ऐन लोकसभा निवडनुकीपुर्वी दिसणाऱया स्व-बखान छाप जाहिराती पाहून तहान लागल्यावर विहीर खोदने म्हणजे काय याचा प्रत्यय येतो.

आश्वासन देणे आणि जनतेच्या  भावनेशी खेळणे जणू राजनीतीचा भाग बनला आहे. आचार संहितेला तीलांजली देऊन एकमेकांवर राजकीय कुरखोडी आणि चिखलफेक करणे हे सुद्धा काही नवीन राहिल नाहीये. पण या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भारतीय राजकारण, समाजकारण न राहता निव्वळ सत्ताकारण बनल आहे.

ज्या देशात शेकड्याने नुसते पक्षच आहेत तिथे स्वार्थीपणाचा कडेलोट होणे साहजिकच आहे, आपली प्रतिमा किती स्वच्छ आहे हे दाखवण्याकरता कोणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला हाताशी धरतात तर कोणी गरीबांचे स्व घोषित वाली होतात. सगळा फार्स... ब्रेंडीगसाठी आटापिटा.... जनतेला समजत नाही अशातला भाग नाही, पण गांधारी सारख अंधत्व आपण ओढवून घेतल आहे.

धृतराष्ट्राच्या जागी सरकार आहे जे नैतिक दृष्ट्या अंध आहे, जे बड्या कॉर्पोरेट हस्ती  उघडपणे देश नागवतायत हे पाहूनही पाहू शकत नाही. आणि सगळ्यात मोठी विडंबना हि कि देशाची लाज राखयाला ठेवलेली कृष्ण रुपी शासन यंत्रणा कलंकित नेत्यांनी गुलाम बनवली आहे.

या सर्व परिस्तिथित अमुलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर नागरी आणि राज्य विषयक ढाच्यामध्ये योग्य बदल करायला हवा त्याच पुनर्रमुल्यांकन व्हायला हव, हि आपल्या देशाची गरज आहे. मुळ जनलोकपाल विधेयकात याला पुरक बरेच मुद्दे आहेत आणि ते पारित झाल्यावर देशातील बरयाच समस्यांचे मुळापासून उच्चाटन होऊ शकते.... डोळ्यावरची पट्टी काढायची हिच योग्य वेळ आहे.  



 

No comments:

Post a Comment