काल जेव्हा अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केली तेव्हा दिल्ली आणि लखनौ मध्ये 'भाजप' आणि 'आप' मध्ये जे काही हिंसक पडसाद उमटले ते फारच खेदजनक आणि एकूण भारतीय राजनीती बाबत अंतर्मुख करणारे होते.
भारतासारख्या सहिष्णू म्हणवणारया देशात जेव्हा वेग-वेगळ्या पक्षांचा झेंडा मिरवणारे आपलेच देश बांधव एकमेकांची टाळकी फोडू लागले, तेंव्हा तो ' हम लोग-तुम लोगचा' मुखवटया आडचा पुरातन चेहरा पुन्हा समोर आला.
त्यावेळी तुझा धर्म माझा धर्म यावर कत्तल उडायची. आता त्याची जागा पक्षांनी घेतलीये, पण दोन्ही वेळचा एक समान धागा कोणाच्या लक्षात येतोय कि नाही कुणास ठाऊक. मरायचे ते सैनिक आणि मरतायत ते कार्यकर्तेच...
केजरीवाल यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला म्हंणून त्यांना अटक झाली, तर त्यासाठी आप कार्यकर्त्यांनी शांततेने का होईना भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याची गरज नव्हती. त्यामुळे एका शुल्लक गोष्टीला राजकीय रंग चढला.
तसेच भाजप कार्यकर्त्यांनीही एव्हढी हिंसक प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. शेवटी मारणारे हि आपलेच आणि मरणारेही आपलेच. निवडणुका येतील आणि जातील पण अशा घटनांनी 'हम लोग-तुम लोग' चा एकदा गेलेला विस्तव कधी विझेल का?
म्हणून कार्यकर्त्यांनो अंतर्मुख व्हा. कोणी आदेश देत म्हणून सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून सुसाट कोणाच्याही अंगावर धावू नका. आपण लोकशाहीसाठी निवडणुका घेतोय राजेशाहीसाठी नाही हे विसरू नका. शेवटी काय मरणारे हि आपण आणि.....
भारतासारख्या सहिष्णू म्हणवणारया देशात जेव्हा वेग-वेगळ्या पक्षांचा झेंडा मिरवणारे आपलेच देश बांधव एकमेकांची टाळकी फोडू लागले, तेंव्हा तो ' हम लोग-तुम लोगचा' मुखवटया आडचा पुरातन चेहरा पुन्हा समोर आला.
त्यावेळी तुझा धर्म माझा धर्म यावर कत्तल उडायची. आता त्याची जागा पक्षांनी घेतलीये, पण दोन्ही वेळचा एक समान धागा कोणाच्या लक्षात येतोय कि नाही कुणास ठाऊक. मरायचे ते सैनिक आणि मरतायत ते कार्यकर्तेच...
केजरीवाल यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाला म्हंणून त्यांना अटक झाली, तर त्यासाठी आप कार्यकर्त्यांनी शांततेने का होईना भाजप कार्यालयासमोर निदर्शने करण्याची गरज नव्हती. त्यामुळे एका शुल्लक गोष्टीला राजकीय रंग चढला.
तसेच भाजप कार्यकर्त्यांनीही एव्हढी हिंसक प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. शेवटी मारणारे हि आपलेच आणि मरणारेही आपलेच. निवडणुका येतील आणि जातील पण अशा घटनांनी 'हम लोग-तुम लोग' चा एकदा गेलेला विस्तव कधी विझेल का?
म्हणून कार्यकर्त्यांनो अंतर्मुख व्हा. कोणी आदेश देत म्हणून सद्सदविवेक बुद्धी गहाण टाकून सुसाट कोणाच्याही अंगावर धावू नका. आपण लोकशाहीसाठी निवडणुका घेतोय राजेशाहीसाठी नाही हे विसरू नका. शेवटी काय मरणारे हि आपण आणि.....
No comments:
Post a Comment