Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Tuesday 4 March 2014

गाव

कधी आपल्याला बोअर झाल कि पुन्हा ताजतवान होण्यासाठी गावा शिवाय दुसरी जागा सहसा डोक्यात येत नाही. सातारयाला गेल्यावर सुद्धा असच नेहमी ताजतवान वाटत. शहरातले रुक्ष चेहरे तिथे अपोआप बोलू लागतात... श्वास घोटुन टाकणारी हवा तिथे पुन्हा जीवन देते....

गर्दी तशी इथेहि आहे आणि तिथेहि, फरक फक्त इतकाच कि तिथली गर्दी उत्सव साजरा करते. समोरचा अनोळखी चेहरा सुद्धा तुमच्याकडे पाहून स्मित करतो जणू अप्रत्यक्षपणे तुम्हाला सांगत असतो 'या तुमच स्वागत आहे'

काम करून काळवंडलेले चेहरे सुद्धा तिथे उजळ वाटतात आणि त्यांच्या समोर मेक अप आडचे चेहरे काळवंडलेले.तिथे गरीबाच्या पुढ्यात चिल्लर टाकून त्याची भूक चाळवली जात नाही तर भाकरीच्या तुकड्याने शांत केली जाते.

गावाकडे अस बरच काही शिकण्यासारख आहे.... नशीब माझ मलासुद्धा एक गाव आहे......

   

No comments:

Post a Comment